मुंबई: श्रमजीवी संघटनेच्या वतीने आदिवासी बांधवांच्या न्याय्य मागण्यांसाठी बेमुदत अन्नसत्याग्रह कालपासून सुरू करण्यात आला. आज त्या आंदोलनस्थळी भेट देऊन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी
मुंबई: श्रमजीवी संघटनेच्या वतीने आदिवासी बांधवांच्या न्याय्य मागण्यांसाठी बेमुदत अन्नसत्याग्रह कालपासून सुरू करण्यात आला. आज त्या आंदोलनस्थळी भेट देऊन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा दर्शविला. अन्नधान्यासारख्या प्राथमिक बाबींसाठी आदिवासींना रस्त्यावर उतरावे लागले, हे खरोखरच दुर्दैवी आहे. आपण सारे कोरोनाचा सामना करीत असताना टाळेबंदीच्या काळात आदिवासी बांधवांना सरकारकडून अन्नधान्य मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. अधिकारी, मंत्री, मा. मुख्यमंत्री असे सारे मार्ग झाल्यानंतर त्यांना नाईलाजाने न्यायालयात धाव घ्यावी लागली, असे फडणवीस म्हणाले.