उदय सामंत म्हणजे कोकणचे शक्ती कपूर, चिपी विमानतळ, वैद्यकीय महाविद्यालयांचे श्रेय नारायण राणे यांचेच : नितेश राणे

'आमच्या कोकणाचे शक्ती कपूर व कोकणातील सचिन वाझेचे भाऊ सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दोन घोषणा केल्या. त्यातील एक म्हणजे कोकणात येणारे वैद्यकीय महाविद्यालय. या महाविद्यालयाबद्दल आम्हाला सर्व जणांना आनंद आहे. पण या महाविद्यालयाची परवानगी नारायण राणे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर मिळाली तर चीपी विमानतळासाठीच्या विमानसेवा सुरू करण्याच्या परवानगीदेखील नारायण राणेंमुळेच मिळाली,' असे नितेश राणेंनी म्हटले आहे.

    मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय कॉलेज व चिपी विमानतळावरुन सिंधुदूर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर आमदार नितेश राणे यानी व्टिट करत टिका केली आहे. सिंधुदुर्गमधील वैद्यकीय कॉलेजला संबंधित प्राधिकरणांनी मान्यता दिली आहे. तर, सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळाला परवाना मिळाल्याची माहिती सामंत यानी काल दिली आहे.  त्यावर आ. नितेश राणे यांनी एक चित्रफित ट्वीट करत पालकमंत्री उदय सामंत कोकणातील “शक्ती कपूर” असल्याची टीका केली आहे. चिपी विमानतळ व वैद्यकीय महाविद्यालय यांचे श्रेय केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आहे, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

    दोन्ही निर्णयांचे श्रेय राणेंचे

    त्यांनी म्हटले आहे की, ‘आमच्या कोकणाचे शक्ती कपूर व कोकणातील सचिन वाझेचे भाऊ सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दोन घोषणा केल्या. त्यातील एक म्हणजे कोकणात येणारे वैद्यकीय महाविद्यालय. या महाविद्यालयाबद्दल आम्हाला सर्व जणांना आनंद आहे. पण या महाविद्यालयाची परवानगी नारायण राणे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर मिळाली तर चीपी विमानतळासाठीच्या विमानसेवा सुरू करण्याच्या परवानगीदेखील नारायण राणेंमुळेच मिळाली,’ असे नितेश राणेंनी म्हटले आहे.

    तेव्हा परवानगी कशी मिळाली नाही

    त्यांनी पुढे म्हटले आहे की, ‘२०१४ ते २०१९ मध्ये तुमच्या शिवसेनेचे अरविंद सावंत हे केंद्रात मंत्री होते. तेही कोकणचे सुपुत्र आहेत. तेव्हा तुम्हाला कशी परवानगी मिळाली नाही? तेव्हा तर तुम्ही भाजपमध्ये युतीत होतात. तेव्हा परवानगी कशी मिळाली नाही. राणे मंत्री झाल्यावर कशा परवानग्या मिळतात. केंद्र सरकारची मदत घेऊन हे दोन्ही प्रकल्प मार्गी कसे लागतील याचा विचार उदय सामंत यांनी करावा,’ असे सवालही राणेंनी विचारले आहेत.