अहमदनगर जिल्हा सोमवारपासून पूर्णपणे अनलॉक होणार, हसन मुश्रीफ यांची घोषणा

शिवस्वराज्य दिनानिमित्त सरकारी कार्यालयांवर भगवा झेंडा फडकवण्याचे राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केले. त्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी याला विरोध केला. मात्र, सदावर्ते यांना नेमकी अडचण काय आहे? असा सवाल हसन मुश्रीफ यांनी उपस्थित केलाय.

    अहमदनगर : सोमवारपासून जिल्हा पूर्णपणे अनलॉक होणार असल्याची घोषणा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. अहमदनगर येथे पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली आहे. अहमदनगर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 4.30% इतका आहे. राज्याच्या निकषानुसार हा रेट 5% पेक्षा कमी असल्याने अहमदनगर जिल्हा पहिल्या टप्प्यात येत असून सोमवारपासून पूर्णपणे अनलॉक होणार आहे.

    शिवस्वराज्य दिनानिमित्त सरकारी कार्यालयांवर भगवा झेंडा फडकवण्याचे राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केले. त्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी याला विरोध केला. मात्र, सदावर्ते यांना नेमकी अडचण काय आहे? असा सवाल हसन मुश्रीफ यांनी उपस्थित केलाय.

    मराठा आरक्षणाच्या वेळी देखील त्यांनी असाच विरोध केला होता. त्यामुळे त्यांचे भारतीय जनता पक्षासोबत कनेक्शन आहे की काय असा वास येत असल्याचं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय.