संगमनेर व अकोले या दोन्ही तालुक्यांच्या सरहद्दीवर जाचकवाडी हे गाव वसलेले आहे महाले यांना सुरूवाती पासूनच शेतीची चांगली आवड आहे त्यामुळे पंधरा ते विस वर्षांन पूर्वी त्यांनी आपल्या शेतात द्राक्षे, डाळींब, या फळबागा केल्या होत्या मात्र त्यात त्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता
संगमनेर : संगमनेर व अकोले या दोन्ही तालुक्यांच्या सरहद्दीवर असलेल्या जाचकवाडी येथील कारभारी कमळू महाले व त्यांचा मुलगा योगेश यांनी जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर चार एकर शेतात अंजीराच्या बागा फुलवल्या आहे त्यामुळे सध्या एका किलो या अंजीराला शंभर रूपयांचा भाव मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
संगमनेर व अकोले या दोन्ही तालुक्यांच्या सरहद्दीवर जाचकवाडी हे गाव वसलेले आहे महाले यांना सुरूवाती पासूनच शेतीची चांगली आवड आहे त्यामुळे पंधरा ते विस वर्षांन पूर्वी त्यांनी आपल्या शेतात द्राक्षे, डाळींब, या फळबागा केल्या होत्या मात्र त्यात त्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता त्यानंतर त्यांनी अंजीर लावण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार प्रथम दोन हजार सालामध्ये तीस गुंठे शेतीत दिडशे अंजीरांच्या झाडांची लागवड केली होती पुढे अंजीरामध्ये चांगले पैसे मिळू लागल्याने आज जवळपास महाले यांच्या चार एकर शेतात दोन हजार अंजीरांची झाडे आहेत सध्या अंजरीच्या बागा सुरू झाल्या असून पुणे जिल्ह्यातील ओतूर, बेल्हे, आळेफाटा, कोतुळ आदि ठिकाणच्या बाजारांन मध्ये महाले स्वत्ता अंजीर विकण्यासाठी घेवून जात आहे.
एका किलोला जवळपास शंभर रूपयांचा भाव मिळत असल्याचे ते सांगतात सध्या अंजीर सुरू झाले असून चार ते पाच महिने या बाग चालतात या अंजीरातून दहा ते बारा लाख रूपये मिळतील अशी अपेक्षा महाले यांची आहे विशेष बाब म्हणजे अंजीरांच्या बागेंना खर्चही खूप कमी लागत असून जास्त करून शेणखतांचा वापर आम्ही करत आहे इतर बागेंच्या तुलनेत अंजीराला खूप कमी खर्च येत आहे जवळपास एका अंजीराच्या झाडाला विस किलो अंजीर निघत असतात दररोज सकाळी आम्ही अंजीर तोडत असतो मागील वर्षी कोरोनाचे संकट असताना सगळीकडे लाॅकडाऊन होते मात्र तरीही अंजीराला चांगली मागणी होती त्यामुळे आम्हांला अंजीराच्या माध्यमातून लाॅकडाऊनच्या काळातही चांगले पैसे मिळाले असल्याचे कारभारी महाले व त्यांचा मुलगा योगेश यांनी सांगितले आहे.