जर सर्वसामान्य लोकांच्या विरोधात हे विरोधक बोलत राहिले, तर.., रोहित पवारांचा भाजपला इशारा

विचारसरणीच्या लोकांना आम्ही राजकीय हेतूतून नाही, तर सर्वसामान्य लोक याला कसे उत्तर देतील हे तुम्हाला बघायला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. तसेच अशा लोकांचे वक्तव्य जास्त मनाला लावून कुणीही घेऊ नये, असं माझ्यासारख्याला वाटतं. असं सातत्याने जर सर्वसामान्य लोकांच्या विरोधात हे विरोधक बोलत राहिले, तर आम्हीसुद्धा त्या ठिकाणी शांत राहणार नाही, असा इशारा रोहित पवारांनी (Rohit Pawar) दिला आहे.

अहमदनगरः केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचा रोहित पवारांनी (Rohit Pawar) चांगलाच समाचार घेतला आहे. विरोधी पक्षातले लोक नुसतेच वक्तव्य करतात, त्याला काही आधार नसतो, असा टोला रोहित पवारांनी दानवेंना लगावला आहे. सातत्याने जर सर्वसामान्य लोकांच्या विरोधात हे विरोधक बोलत राहिले, तर आम्हीसुद्धा त्या ठिकाणी शांत राहणार नाही, असा इशारा रोहित पवारांनी भाजपला (BJP) दिला आहे.

शेतकरी (Farmers) स्वतःच्या हितासाठी लढत आहेत, जर त्याला तुम्ही भारताच्या बाहेरून पाकिस्तान आणि चीनमधून काही जण येऊन या लोकांना प्रेरित करतात, असं म्हणत असाल, तर तुमची विचारसरणी त्या ठिकाणी तुम्ही दाखवून देता, असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले आहेत. तर याच्या आधी दानवेंनी शेतकऱ्यांविषयी केलेले वक्तव्य लोक विसरले नाहीत आणि आताही ते वक्तव्य करतात की पाकिस्तान आणि चीन यांनी सहकार्य केलं पाहिजे, त्यांची विचारसरणी त्याच लेव्हलची आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

तर अशा विचारसरणीच्या लोकांना आम्ही राजकीय हेतूतून नाही, तर सर्वसामान्य लोक याला कसे उत्तर देतील हे तुम्हाला बघायला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. तसेच अशा लोकांचे वक्तव्य जास्त मनाला लावून कुणीही घेऊ नये, असं माझ्यासारख्याला वाटतं. असं सातत्याने जर सर्वसामान्य लोकांच्या विरोधात हे विरोधक बोलत राहिले, तर आम्हीसुद्धा त्या ठिकाणी शांत राहणार नाही, असा इशारा रोहित पवारांनी दिला आहे.