‘राजकीय फटाके फुटायला अजून वेळ’; विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांचं सूचक विधान

राजकीय फटाके सातत्याने फुटत असतात, परंतु, आज आपण केवळ दिवाळीच्या फटाक्यांबद्दल बोलणे उचित राहील. कारण राजकीय फटाके फुटायला अजून वेळ आहे, असे वक्तव्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी केले.

    संभाजीनगर : राजकीय फटाके सातत्याने फुटत असतात, परंतु, आज आपण केवळ दिवाळीच्या फटाक्यांबद्दल बोलणे उचित राहील. कारण राजकीय फटाके फुटायला अजून वेळ आहे, असे वक्तव्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी केले. यामुळे आश्चर्य व्यक्त होत केला.

    नार्वेकरांनी कुलाबा कोळीवाडा येथे स्थानिक पुन्हा नागरिकांबरोबर दिवाळी साजरी केली, तसेच असून राज्यातील जनतेला दिवाळीच्या घेण्यात शुभेच्छादेखील दिल्या. दरम्यान, त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला. नार्वेकरांनी या संवादादरम्यान, दिवाळीच्या फटाक्यांसह राजकीय फटाक्यांवर भाष्य केले. सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकर यांना शिवसेनेच्या आमदार अपात्रतेसंदर्भात सुनावणी घेऊन ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे नार्वेकर यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी ३१ डिसेंबरच्या राजकीय फटक्यांबाबत प्रश्न विचारला.

    त्यावर नार्वेकर म्हणाले, तुम्ही त्याची काळजी करू नका, राजकीय फटाके फुटण्यास थोडा वेळ बाकी आहे. जनसामान्यांना अपेक्षित निर्णय होणे गरजेचे आहे. लोकशाहीत असे निर्णय होत असताना ते संवैधानिक चौकटीत व्हायला पाहिजेत. असे निर्णय शास्वत ठरायला हवेत. हे निर्णय टिकून कसे राहतील, याचा विचार करणे अपेक्षित आहे.

    आपले सरकार संवेदनशील आहे, विधीमंडळही संवेदनशील आहे. त्यामुळे येत्या काळात आपण एक शास्वत आणि टिकाऊ निर्णय घेऊ. त्याला विधीमंडळाची साथ मिळेल. राजकीयदृष्ट्या जनतेला न्याय मिळेल असा निर्णय होणं अपेक्षित आहे. त्यासाठी कायद्यात असणाऱ्या तरतुदी, संविधानातील तरतुदींचे पालन केले जाईल, असेही ते म्हणाले.