अस्वलांचा धुमाकुळ, कळपाला शेतकऱ्यांनी लावले हाकलून

    चंद्रपूर (Chandrapur) : चंद्रपूर जिल्हा आणि वाघ हे समिकरण जुळलेलं. वाघाच्या हल्यांनी गावे दहशतीत आहेत, शेती ओस पडली आह. अशात आता अस्वलांच्या धुमाकुळाने गावकरी धास्तावले आहेत.

    एक दोन नाही तब्बल तीन अस्वलांनी शेतात धुडघुस घातलाय. तळोधी बांधकाम वनपरिक्षेत्रातील वाढोणा-सावरगाव मार्गावर अस्वलांचा कळप दिसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.