
Manoj Jarange : जालना मराठा क्रांती मोर्चाला आक्रमक वळण लागल्यानंतर महाराष्ट्र सरकारने काही आश्वासने दिली होती. आता मराठा आरक्षणासाठी लढा उभारलेले मनोज जरांगे सध्या पुण्या दौऱ्यावर आहेत. मराठा आरक्षणासाठी आक्रमक लढा उभारलेले मनोज जरांगे पाटील यांच्या सध्या राज्यभरात विविध भागांमध्ये सभा होत आहेत. आरक्षणासाठी सरकारला २८ ऑक्टोंबरपर्यंतची मुदत दिल्यानंतर जरांगे पाटील राज्यभर दौरे करीत आहेत. आज (शुक्रवार, २० ऑक्टोंबर) पुण्याच्या राजगुरूनगरमध्ये त्यांची सभा होत असून, या विराटसभेतून जरांगेंनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे.
मनोज जरांगे यांचे जमलेल्या गर्दीला संबोधन
दरम्यान, या सभेवेळी मनोज जरांगे यांनी जमलेल्या गर्दीला संबोधित केले सरतेशेवटी मंचावर काल आत्महत्या केलेल्या कावळे यांना श्रध्दाजंली देण्यासाठी सर्वजण उभे असतानाच अचानक एका आंदोलकाने मंचावर भाषण करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे सभेमध्ये गोंधळ झाल्याचे दिसून आले. या तरुणाने मंचावर जाऊन भाषण करण्याचा आणि घोषणा देण्याचा प्रयत्न केला.
सभेत काय घडलं?
मनोज जरांगे यांनी भाषण केले त्यावेळी ते म्हणाले सर्वांना मला भेटायचे असते पण शक्य होत नाही, या मुद्द्यावर त्यांनी भाषण संपवले, त्यानंतर काल मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या आंदोलकाला श्रध्दाजंली देण्याचे ठरले. त्याबाबतची घोषणादेखील झाली. त्याचवेळी एक तरुण मंचावर आला. तो आक्रमक दिसून आला, त्याने माईक हातात घेत बोलण्याचा प्रयत्न केला. वेळीच त्याला आयोजक आणि पोलसांनी आवरण्याचा प्रयत्न केला.