बालकुमार साहित्य मेळाव्याला बालकवी आणि विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद

बालकुमार साहित्य मेळाव्याचे उद्धाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. तर बालकुमार साहित्य मेळाव्यात अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी मुलामध्ये मिसळत मुलाना बोलते केले. बालकुमार साहित्य मेळाव्याला बाल कवी आणि विध्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद लाभला.

    नाशिक, कुसुमाग्रजनगरी, मेंट, ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शुक्रवारी मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे. आज साहित्य संमेलनाचा दुसरा दिवस आहे, आज दिवसभरात सुधा भरगच्य कार्यक्रमाचा आनंद साहित्य रसिकांना अनुभवता येणार आहे.आज सकाळी ११ वाजता बालकुमार साहित्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात १२५ पेक्षा अधिक बाळकवी सहभागी झाले होते. हे बालकवी ६ ते १५ वयोगटातील होते. बालकुमार साहित्य मेळाव्याला बालकवी आणि विध्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.

    यावेळी अभिनेते दिलीप प्रभावळकर विध्यार्थ्यां शी संवाद साधला. तसेंच मुलांनी सुद्धा दिलीप प्रभावळकर यांना अनेक प्रश्न विचारले. “बोक्या सातबंडे” हे नाव कसे सुचले? या वयातसुद्धा तुमचा उत्साह कसा काय? आदी प्रन्न मुलांनी विचारले.

    यावेळी स्वागताध्यक्ष छगन भुजबळ म्हणाले की, इतिहासात प्रथमतः साहित्य संमेलनात बालकुमार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच साहित्य संमेलनाच्या ९३ वर्षाच्या इतिहासात झाले नाही ते नवे उपक्रम आपण या साहित्य संमेलनात घेतले आहे. यामध्ये चित्रकलेसह विविध कलांना स्थान दिले आहे. मुलांमध्ये बालपणापासूनच साहित्याची आवड निर्माण व्हावी हा या बाल साहित्य मेळाव्याचा महत्वाचा उद्देश असल्याचे सांगत बालसाहित्य मेळाव्यास मिळालेला प्रतिसाद बघता यापुढील होणाऱ्या साहित्य संमेलनात देखील बालकवी मेळाव्याचा सहभाग असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच उपस्थितांचा उत्साह बघून आपले व आपल्या मात्या पितांचे आभार मानतो असे भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

    यावेळी दिलीप प्रभावळकर म्हणाले की, आजकालची मुलं अधिक स्मार्ट झाली आहे. प्रत्येकात कुठलीना कुठली कला असते ती बाहेर पडली पाहिजे. आपल्यात जी कला आहे ती दाबून न ठेवता व्यक्त करावी यामध्ये पालकांनी देखील विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. वाचलेलं सांगल साहित्य लिहायला प्रेरणा देते. बालकांनी साहित्याशी दोस्ती करावी. त्यांनी पुस्तकाची संगत साहित्याची साथ सोडू नये असे सांगत
    दरदरोज तीनचार ओळींचे लिखाण करत पुस्तकाची तीन चार पाने दररोज वाचावी असे आवाहन त्यांनी केली.

    यावेळी दिलीप प्रभावळकर यांनी उपस्थित बालकांशी संवाद साधला बालकांनी विचारलेल्या प्रश्नांना प्रभावळकर यांनी दिली दिलखुलास उत्तरे देत त्यांनी चित्रपटात चिमणराव, बोक्या सात बंडे, तात्या विंचू, चौकट राजा, नारबा, आबा टिपरे यासह केलेल्या विविध भूमिकाबाबतचा पट मुलांसमोर उभा केला. तसेच बालकुमार साहित्य मेळाव्यात हजर राहण्याची संधी मिळाली याचा आनंद होत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

    लिटिल चॅम्प फेम ओमकार कानिटकर, जय गांगुर्डे, राशी पगारे यांच्या गाण्यांनी रंगला बालसाहित्य मेळावा.

    ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आयोजित बालसाहित्य मेळाव्यात लिटिल चॅम्प फेम ओमकार कानिटकर व जय गांगुर्डे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी विविध गाण्याचे सादरीकरण यावेळी केले. याला बालकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

    बालसाहित्य मेळाव्यात बाल चित्रकारांनी रेखाटली सुंदर चित्रे

    ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात इतिहासात पहिल्यांदाच बालसाहित्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या बाल साहित्य मेळाव्यात अनेक बाल चित्रकारांनी आपला सहभाग नोंदविला. यावेळी या बालकरांनी विविध सुंदर चित्रे रेखाटली. या बाल मेळाव्यात ३ वर्षाची ओजस्वी काने ही चिमुकली चित्र कलाकार देखील सहभागी झाली. तसेच इयत्ता ५ वीत शिकणारा मयुरेश आढावा या विद्यार्थ्याने रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन याठिकाणी लावण्यात आले होते. यावेळी मंत्री छगन भुजबळ व ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. बालकुमार साहित्य मेळाव्यात विध्यार्थ्यांनी अतिशय सुरेख आणि उत्तम चित्रे साकारली.

    बालकुमार साहित्य मेळाव्याचे उद्धाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. तर बालकुमार साहित्य मेळाव्यात अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी मुलामध्ये मिसळत मुलाना बोलते केले. बालकुमार साहित्य मेळाव्याला बाल कवी आणि विध्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मिलिंद जोशी,जयप्रकाश जातेगावकर,समीर भुजबळ,पंकज भुजबळ,विश्वास ठाकूर, प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे, प्राचार्य प्रशांत पाटील,संतोष हुदलीकर, संजय करंजकर,विशाखा भुजबळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.