उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्याने दिड एक्कर टरबुजातुन मिळवला आडीच लाखाचा निव्वळ नफा

    उस्मानाबाद : उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील शेतकरी अनिल टेळे यांनी दिड एक्कर टरबुजाची लागवड १ लाख रुपये खर्चून केली. या दिड एक्कर टरबुजातुन त्यांना साडेतीन लाखाचे उत्पन्न मिळाले आहे.

    दरम्यान खर्च वजा जाता पहिल्या वर्षी निव्वळ आडीच लाखाचे उत्पन्न मिळाले असुन लगेच त्याच बेडवर दुसरी लागवड करणार आहेत. दुसऱ्या टरबुज पिकासाठी फक्त ५० ते ६० हजार खर्च येणार असुन मार्केट असेच राहिल्यास किमान ३ लाखाचा निव्वळ नफा होईल अशी आशा त्यांना आहे.