बागेश्वर महाराजचे ‘चमत्कार’ पाहून भारावली मुस्लिम महिला! म्हणाली, मी हिंदू धर्म स्वीकारणार

महिलेने सांगितले की, सनातन धर्म सर्वोत्तम आहे कारण पती-पत्नीचे नाते तिहेरी तलाक बोलून संपत नाही. महिलेचे म्हणणे ऐकून मंचावर उपस्थित लोकांनी बाबांचा जयजयकार सुरू केला.

    रायपूर : छत्तीसगडमधील रायपूरमध्ये सध्या बागेश्वर धाम (Bageshwar Dham) कथा सप्ताह सुरू आहे. वादानंतर बागेश्वर महाराज (Bageshwar Mahara)चांगलेच चर्चेत  आले आहे. शनिवारी पुन्हा एकदा बागेश्वर महाराजांचा दिव्य दरबार आयोजीत करण्यात आला होता. या दैवी दरबारात एका एका मुस्लिम महिलेने बाबांचा चमत्कार पाहून प्रभावित झाली आणि तिने मंचावरूनच हिंदू धर्म स्वीकारल्याची घोषणा केली.सनातन धर्म सर्वश्रेष्ठ असून, हिंदू धर्मात भाऊ-बहिणीचे लग्न होत नाही. हा धर्म आणि सभ्यता असलेला समाज आहे.

    सुलताना असे या महिलेचे नाव आहे. ती छत्तीसगडमधील बिलासपूर येथील रहिवासी आहे. महिलेने सांगितले की, सनातन धर्म सर्वोत्तम आहे कारण पती-पत्नीचे नाते तिहेरी तलाक बोलून संपत नाही. महिलेचे म्हणणे ऐकून मंचावर उपस्थित लोकांनी बाबांचा जयजयकार सुरू केला. महिलेने बाबांच्या दैवी दरबारात अर्ज केला होता. बाबांनी पुन्हा एकदा महिलेची समस्या तिला न सांगता कागदावर लिहून दिली. बाबांचा हा चमत्कार पाहून ती प्रभावित झाली आणि तिने हिंदु धर्म स्वीकारण्याच निर्णय घेतला.

    तीन जणांनी इस्लाम सोडून सनातन धर्म स्वीकारण्याची व्यक्त केली इच्छा

    बागेश्वर धामचे महाराज पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra shastri)  यांच्या दैवी दरबारात शनिवारी ओडिशातील तिघांनी हिंदू धर्मात परतल्याची घोषणा केली. ते म्हणाले की, आम्ही इस्लाम सोडून सनातन धर्म स्वीकारण्याची घोषणा करतो. बागेश्वर महाराज यांनी मंचावरूनच सर्वांचे स्वागत केले. तत्पूर्वी दिव्य दरबारात महाराजांनी अनेक भक्तांचे अर्ज ऐकले. त्यांच्या समस्या न विचारता त्या आधीच कागदावर लिहून त्या सोडवण्यासाठी बागेश्वर बाबांवर विश्वास ठेवण्यास सांगितले.

    अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप होता

    नागपुरातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव () यांनी बागेश्वर महाराज अंधश्रद्धा पसरवत असल्याचा आरोप केला होता. माझ्या आव्हानाच्या दोन दिवस आधी महाराज येथून पळून गेले, असा आरोप केला. या आव्हानाला उत्तर देताना धीरेंद्र शास्त्री यांनी रायपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. आव्हान स्वीकारताना ते म्हणाले होते की, आरोप करणाऱ्यांचे रायपूरमध्ये स्वागत आहे. मी दैवी दरबारात उत्तर देईन.

    रायपूरमध्ये देण्यात आला लाईव्ह डेमो

    याआधी शुक्रवारी बागेश्वर धाम सरकारने पत्रकारांना आपल्या सिद्ध शक्तीचा लाईव्ह डेमो दिला होता. त्यांनी मंचावरून एका पत्रकाराचे नाव पुकारले. त्यानंतर त्यांनी भाऊ आणि भाचीशी संबंधित माहिती सर्वांसमोर ठेवली होती. ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.