पिंपरी : लोकांतील लोक कधी दबावतंत्राला घाबरत नाहीत. घाबरलेले तिकडे गेले आहेत. तिकडे गेलेले काही लोक संपर्कात आहेत. तेथील अनेकांची चलबिचल चालली आहे. त्यांच्यात अस्वस्थता आहे. ते लवकरच आमच्याकडे येतील, असे मत आमदार रोहित पवारयांनी व्यक्त पिंपरी येथे केले.
या मान्यवरांची उपस्थिती
पिंपरीत झालेल्या पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी महापौर आझमभाई पानसरे, प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे, युवकशहराध्यक्ष इम्रान शेख, माजी नगरसेविका सुलक्षणा धर, काशिनाथ नखाते आदी उपस्थित होते.
भाजपमधील संघर्ष दिसतो
कोणाचे पालकमंत्रीपद काढले आणि कोणाला दिले यावरून भाजपमधील संघर्ष दिसतो असे सांगत आमदार रोहित पवार म्हणाले, कंत्राटी नोकरभरती, अवाजवी परीक्षा शुल्क, पेपरफुटी, शाळा दत्तक योजना या विरोधात 25 ऑक्टोबरपासून युवा संघर्ष यात्राकाढण्यात येणार आहे.
दिवाळी यात्रेतच साजरी करणार
25 तारखेला तुळापूर येथून 800 किलोमीटर पायी पदयात्रेला सुरुवात होईल. 45 दिवस 830 गावे, दहाजिल्हे 28 तालुके असा यात्रेचा प्रवास असणार आहे. 200 लोक यात्रेत चालणार आहोत. दिवाळी यात्रेतच साजरी करणार आहे. युवक, त्यांच्या पालकांना खूप सोसावे लागत आहे.
अभियंता झाले, स्पर्धा परीक्षा दिली पण नोकरी नाही. विद्यार्थी, पालकांचा संघर्ष सुरू आहे. शाळा दत्तक योजना खासगीकरणाचीपहिली पायरी आहे. समूह शाळा योजना बंद करू नये, आदिवासी पाडे हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. कंत्राटी भरतीतएका तलाठी पदासाठी 22 ते 23 लाख रुपये मागितले जात आहेत. पैसे भरून अधिकारी होणारा कधीही जनतेची कामे प्रामाणिकपणेकरू शकत नाही. पदवी मिळाली तर नोकरी मिळत नाही. त्यासाठी युवा आयोग झाला पाहिजे.
नोकरी नसलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कर्ज माफ करावे. ही यात्रा अराजकीय आहे. 830 गावात मुक्काम करणार आहोत. काहीगावात भाजपचे सरपंच आहेत. त्यातील 30 गावातील सरपंच यांनी आम्हाला पाठींबा दिला आहे. लोकांचे प्रश्न आम्ही आवाज उठवतआहेत. सर्वांना पत्र दिले आहे. कोणीही यात्रेत सहभागी होऊ शकतो, असेही ते म्हणाले.
शहरात महाराष्ट्रातील लोक राहत आहेत. आतापर्यंत ४० हजार युवकांनी नोंदणी केली आहे. संघर्ष करण्याची आमची भूमिका आहे. गावात मुक्काम करणार आहोत. काही गावात भाजपचे सरपंच आहेत. त्यातील ३० गावातील सरपंच यांनी आम्हाला पाठींबा दिला आहे. लोकांचे प्रश्न आम्ही आवाज उठवत आहेत. सर्वांना पत्र दिले आहे. कोणीही यात्रेत सहभागी होऊ शकतो.
नागपुरातून फक्त नितीन गडकरी विजयी होणार….
बारामती लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची केवळ चर्चा आहे. अशीच चर्चानागपूरमध्येही आहे. तिथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा आहे. गडकरी वगळताभाजपच्या उमेदवाराचा पराभव होईल अशी तिथे चर्चा असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी बारामतीच्याप्रश्नाला नेहमी प्रमाणे बगल दिली.
अजित पवार यांची ताकद कमी करण्याचे प्रयत्न…
येरवडा येथील पोलिसांच्या जागेचा विषय आताच बाहेर येण्यामागे नक्कीच मोठे कारण असणार आहे. अजित पवार यांची ताकद कमीकरण्यासाठी भाजप कडून असे सगळे प्रयत्न सुरु असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला.
राज्यात गुन्हेगारी वाढली…
पिंपरी चिंचवड शहरांसोबत संपूर्ण राज्यात गुन्हेगारी वाढलेली आहे. राजकीय हेतूने गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढत आहे. तसेच गुन्हादाखल झाल्यानंतर त्यावर लगेच कारवाई होत नसल्याचेहि रोहित पवार म्हणाले.