पायाभूत सुविधांसाठी भरीव निधी देऊ; केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचे प्रतिपादन

. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा व नावलौकिक ऊंचावत असल्याचा मनस्वी आनंद आहे. अर्थ खात्याचा राज्यमंत्री या नात्याने पायाभूत सुविधासाठी भरीव निधी देऊ, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले.

    औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा व नावलौकिक ऊंचावत असल्याचा मनस्वी आनंद आहे. अर्थ खात्याचा राज्यमंत्री या नात्याने पायाभूत सुविधासाठी भरीव निधी देऊ, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६३ वा वर्धापन दिन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या प्रमूख उपस्थितीत सोमवारी (दि.२३) विविध कार्यक्रमानी साजरा करण्यात आला. विद्यापीठाच्या नाटयगृहात मुख्य समारंभ झाला. यंदाच्या वर्धापनदिनाचे प्रमुख पाहुणे डॉ. भागवत कराड ( केंद्रीय अर्थराज्यमंत्री) होते. केंद्रीय मंत्रीमंडळात महत्वपूर्ण पदावर डॉ.कराड यांची नियुक्ती झाल्यानंतर ते पहिल्यांदाच विद्यापीठात आले. प्रारंभी वर्धापन दिनानिमित्त प्रशासकीय इमारती समोरील हिरवळीवर मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते ध्वजारोहण कारण्यात आले. मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे, कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.नरेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

    जीवनसाधना पुरस्कार प्राप्त मो.अब्दुल रज्जाक व प्राचार्य डॉ.रमेश दापके यांची उपस्थिती होती. तसेच व्यवस्थापन सदस्य प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख, डॉ.भालचंद्र वायकर, डॉ.पुâलचंद सलामपुरे, डॉ.राजेश करपे, डॉ.चेतना सोनकांबळे, डॉ.राहुल मस्के, डॉ.प्रतिभा अहिरे, सुनील निकम आदींची मंचावर उपस्थिती होती. यावेळी ना. भागवत कराड म्हणाले, आपल्या राजकीय चळवळीची सुरुवात विद्यापीठातूनच झाली. एमबीबीएस व एम.एस अशा दोन पदव्या याच विद्यापीठात घेतल्या. आंदोलन, कामाच्या निमित्ताने शेकडो वेळा विद्यापीठात आलो मात्र मंत्री म्हणून वर्धापन दिनास उपस्थित राहता आले याचा मनस्वी आनंद आहे. चळवळीची पाश्र्वभुमी असलेले हे विद्यापीठ अत्यंत जागरुक व सजग विद्यार्थी घडवित असते. गेल्या काही वर्षात विद्यापीठात आंदोलन खुप होत असत. मा. डॉ.प्रमोद येवले यांच्या काळात शैक्षणिक दर्जा सुधारला असून आंदोलनेही कमी झाली आहेत, याचे श्रेय विद्यापीठातील सर्वांना दिले पाहिजे. वेंâद्र व राज्य सरकार विद्यापीठास भरीव निधी देईल, मात्र ‘एनआयआरएफ‘ रँकींग मध्ये पहिल्या पन्नास मध्ये विद्यापीठ यावे, असेही डॉ. भागवत कराड म्हणाले.

    लोकांचा विश्वास मिळविण्यात यश : कुलगुरु

    कोणतही सार्वजनिक संस्था लोकांचा विश्वास संपादन केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. विद्यापीठाच्या नावलौकिक ऊंचावतानाच गुणवत्ता सुधारुन लोकांचा विश्वास मिळविण्यात यशस्वी ठरलो, असे अध्यक्षीय समारोपात कुलगरु डॉ.प्रमोद येवले म्हणाले. मागासलेपण झटवूâन आम्ही प्रगती प्रगतीपथावर आहोत. विद्यापीठाची आर्थिक स्थिती बिकट असून अर्थमंत्रालयामार्फत सहकार्य व पाठबळ गरजेचे आहे, असेही कुलगुरु डॉ.प्रमोद येवले म्हणाले. आगामी काळात नामांतर शहीद स्मारक, विद्यापीठ गेटचे सुशोभिकरण, सिंथेटिक ट्रॅक, उद्योजकता विकास केंद्र विकसीत करणात येत, असल्याचेही ते म्हणाले.

    प्रारंभी मा.अब्दुल रज्जाक व डॉ.रमेश दापके यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. या पुरस्कारमुळे आपल्या कार्याचा यर्थाथ गौरव झाल्याची भावना डॉ.रमेश दापके यांनी व्यक्त केली. यावेळी ‘कोविड टेस्टिंग लॅब‘चे संचालक डॉ.गुलाब खेडकर व सहकार्या-यांचाही गौरव करण्यात आला. विद्यापीठाच्या प्रगतीच्या आढावा प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ यांनी प्रास्ताविकात घेतला. डॉ.मुस्तजिब खान यांनी सूत्रसंचालन तर कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी यांनी आभार मानले. कार्यक्रमास माजी कुलगुरु प्राचार्य मधुकर गायकवाड, ज्येष्ठ सदस्य भाऊसाहेब राजळे, प्रा.सुनील मगरे, डॉ.संजय गायकवाड, पंकज भारसाखळे, डॉ.अंकुश कदम, योगिता पाटील आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

    विद्यापीठ परिघाबाहेर राजकारण

    विद्यापीठातील निवडणुकीचा काळ वगळता अन्य वेळेत या भागात राजकारण होता कामा नये. विविध अधिकार मंडळाचे सदस्य यांनी एकदिलाने काम करावे शहरातील सर्व राजकीय पक्षाचे आमदार यांना सोबत घेऊन विद्यापीठाच्या विकासाठी काम करावे, असे डॉ.भागवत कराड म्हणाले.वयाने व पदाने सर्वांपेक्षा वरिष्ठ असल्याने सर्व विचारांच्या लोकांना एकत्रित आणु, असेही ते म्हणाले.

    जीवनसाधना पुरस्काराने गौरव

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त दोघा मान्यवरांना जीवनसाधना पुरस्काराने गौरविण्यात आले. यामध्ये आयुष्याची सहा दशके राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मैदान तयार करण्यात योगदान देणारे मोहम्मद अब्दुल रज्जाक मोहम्मद अब्दुल जब्बार यांना गौरविण्यात आले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘पीईएस‘ संस्थेचे मैदान तयार केल्याबद्दल त्यांच्या विषयी गौरव उदगार काढले होते. तसेच विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपपरिसराचे माजी संचालक प्राचार्य डॉ.रमेश विठ्ठल दापके यांना ‘जीवन साधना पुरस्कार‘ प्रदान करण्यात आला. रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य, अधिसभा, व्यवस्थापन परिषदेसह शिक्षण क्षेत्रासाठी त्यांनी मोठे योगदान दिले..