‘उद्धव ठाकरे- अजित पवार आता तयार रहा…’; बंडातात्यांच्या अटकेनंतर आचार्य तुषार भोसले भडकले

राज्य सरकारचा आदेश झुगारून पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अखेर ताब्यात घेतले आहे. त्यांना दिघीजवळील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात ठेवण्यात आले आहे. बंडातात्यांच्या अटकेनंतर भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले खवळले आहेत. मुघलांपेक्षा ठाकरे सरकार अत्याचारी आहे. बंडातात्यांना अटक करायला लाज कशी वाटली नाही. आता उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी परिणाम भोगायला तयार रहावं, असा दम आचार्य भोसले यांनी भरला आहे.

    औरंगाबाद : राज्य सरकारचा आदेश झुगारून पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अखेर ताब्यात घेतले आहे. त्यांना दिघीजवळील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात ठेवण्यात आले आहे. बंडातात्यांच्या अटकेनंतर भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले खवळले आहेत. मुघलांपेक्षा ठाकरे सरकार अत्याचारी आहे. बंडातात्यांना अटक करायला लाज कशी वाटली नाही. आता उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी परिणाम भोगायला तयार रहावं, असा दम आचार्य भोसले यांनी भरला आहे.

    औरंगजेबापेक्षाही राज्यातलं सरकार अत्याचारी आहे. मुघलांनी सुद्धा वारकऱ्यांचे इतके हाल केले नव्हते. भागवत धर्माची भगवी पताका घेऊन जाणाऱ्या बंडातात्या आणि वारकऱ्यांना अटक करणाऱ्या सरकारला लाज कशी वाटत नाही? तुमचं डोकं ठिकाणावर आहे का?, असा सवाल तुषार भोसले यांनी विचारला. बंडातात्यांच्या अटकेनंतर शिवसेनेला आता भगवा झेंडा हातात घेण्याचा अधिकार नाही, असं म्हणत आचार्य तुषार भोसले यांनी शिवसेनेला देखील लक्ष्य केलं.

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्य सरकारने आषाढी वारी सोहळ्यावर निर्बंध घातले आहेत. केवळ मानाच्या पालख्यांना पंढरपूरमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. वाखरीपासून दीड किलोमीटर अंतरापर्यंत प्रतिकात्मक पायी वारी काढली जाणार आहे. मात्र सामान्य वारकऱ्यांना मात्र पायी वारीस मनाई करण्यात आली आहे.