शक्तिरूपा बनूया!

आपल्या सर्वांमध्ये काही चुकीच्या सवयी आहेत यांना समूळ नष्ट करणे पण आपण काही पदार्थ न खाण्याचे व्रत घेतो, आज कोणत्याही परिवर्तनासाठी दृढता हवी. तसेच, उपवास म्हणजे ईश्वरीय स्मृतीमध्ये राहणे. तेव्हाच आपल्यामध्ये या शक्तीचा संचार होईल. प्रभूस्मृतीमध्ये राहण्याचा अभ्यास आपल्या जीवनाची धारणा बनवावी, अशी ज्ञानयुक्त प्रेरणा देणारा हा नवरात्री उत्सव.

    भारत देशाला ‘माता’ या नावाने संबोधले जाते. ज्या मातेने अनेक जाती, धर्म, पंथ यांना सामावून घेतले आहे. तसेच ‘वसुवैध कुटुम्बकम’ची भावना जागृत राहावी या उद्देशाने अनेक सण, उत्सव याची निर्मिती केली गेली. अनेक सणापैकी एक सण आहे ‘नवरात्री उत्सव’. जो संपूर्ण भारतामध्ये आनंदाने साजरा केला जातो.

    असुरांचा नाश करणारी शक्तिरूपा

    काली, दुर्गा, अम्बा, लक्ष्मी… या देवींचे गायन-पूजन केले जाते. या सर्व देवी ज्यांना शक्तीस्वरुपा म्हटले जाते. अष्टभूजाधारी अस्त्र-शस्त्रानी सुशोभित असे रूप दाखवले जाते. एकीकडे वात्सल्य रूप आई म्हटले जाते. तर दुसरीकडे असुर सहारिणी ही दाखवली जाते. अर्थातच या सर्व देवी पवित्रता, स्नेह, शक्तीचे प्रतिक आहेत. पण त्याचबरोबर दुर्गुणाचा नाश करणारी शक्ती ही आहे. पौराणीक कथांमध्ये चंड, मुण्ड, निकुंभ अशा अनेक असुरांचा नाश करणारी शक्तिरूपा देवींचे गायन केले आहे.

    ही आपलीच प्रतीके

    व्यावहारिक जीवनामध्ये जर आपण बघितले तर ही आपलीच प्रतीके आहेत. आज आपले युद्ध कोणाव्यक्तीबरोबर नसून स्वतः बरोबरच आहे. म्हणून या दुर्गुणांना समाप्त करण्यासाठी अष्टशक्तीना धारण करण्याची गरज आहे. त्यासाठी आपण नऊ दिवस जागरण, व्रत, उपवास करतो. या सर्वाचे आध्यात्मिक अर्थ आपण जाणून घेऊ या.

    नवरात्रीच्या प्रथम दिवशी घटस्थापना

    नवरात्रीच्या प्रथम दिवशी घटस्थापना केली जाते. मातीच्या सजवलेल्या घटामध्ये दिवा लावला जातो व त्याची घरामध्ये, मंदिरामध्ये स्थापना केली जाते. मातीचा घट हे या नश्वर शरीराचे प्रतिक आहे व त्यात लावलेला दिवा हा चैतन्य शक्ती आत्म्याचे प्रतिक आहे. ज्या मनुष्याने ही आत्मज्योत प्रज्वलित केली तोच दुर्गुणाचा नाश करु शकतो. आत्मज्योतीला जागवणे म्हणजेच खरे जागरण. व्रत अर्थात दृढ संकल्प करणे. आपल्या सर्वांमध्ये काही चुकीच्या सवयी आहेत यांना समूळ नष्ट करणे पण आपण काही पदार्थ न खाण्याचे व्रत घेतो, आज कोणत्याही परिवर्तनासाठी दृढता हवी. तसेच उपवास म्हणजे ईश्वरीय स्मृतीमध्ये राहणे. तेव्हाच आपल्यामध्ये या शक्तीचा संचार होईल. प्रभूस्मृतीमध्ये राहण्याचा अभ्यास आपल्या जीवनाची धारणा बनवावी अशी ज्ञानयुक्त प्रेरणा देणारा हा नवरात्री उत्सव.

    अष्टभुजा हे आत्म्याच्या आठ शक्तीचे सूचक आहे यांना जाणून घेऊया.    
    पार्वती देवी (विस्ताराला संकीर्ण करणे) :
    आज मनुष्यासमोर समस्यांची मालिका चालू आहे, रोज तिचे नवे रूप. अशा वेळी त्या परिस्थितीवर जास्त विचार करण्याची सवय या मनाला लागते. पण विस्तार केल्याने वेळ, शक्ती, संकल्प… यांचा फक्त खर्चच होतो. जितक्या कमी वेळात त्याला साररुपात समजू तितके आपण समाधानावर विचार करू शकू. या शक्तीचे प्रतिक पार्वती देवीला दाखवली जाते. शंकर तपस्येमध्ये मग्न असले तरी पार्वतीदेवी आपल्या जवाबदाऱ्या पार पाडते अर्थात आपण गृहस्थ जीवनामध्ये राहूनच हि practice करावी. तसेच गाय दाखवली जाते. गायीला शुभ मानले जाते. तिचे प्रत्येक अवयव उपयोगी पडतात अर्थात नवजीवन देण्याची क्षमता गायीमध्ये आहे. जेव्हा आपल्यामध्ये साररुपात बाबींना समजण्याची कला येते तेव्हा शक्तिशाली बनून आपण दुसऱ्यांना बळ देऊ लागतो.
    दुर्गादेवी (समेटण्याची शक्ती) :
    वर्तमान परिस्थिती आपल्याला अचानक येणाऱ्या सर्व घटनांसाठी तयार राहण्याचा मौन संदेश देत आहे. ‘श्वास का क्या विश्वास’ म्हणजेच आपला अन्त कधी आहे ते आपल्यालाच माहित नाही. म्हणून कोणतीही गोष्ट पकडून ठेऊ नका. जर या गोष्टीना आपण सोडले नाही तर ते दुःख एका सावलीप्रमाणे बरोबर राहील. म्हणून झालेल्या सर्व बाबींना लगेच विसरण्याचा प्रयत्न करावा. तेव्हाच आपण सर्वाचा स्वीकार करू शकतो म्हणून या शक्तीचे प्रतिक दुर्गादेवी दाखवली जाते. जिला आई म्हटले जाते. प्रेम आणि शक्तीचे प्रतिक आहे. दुर्गादेवीच्या हातामध्ये शस्त्र असली तरी नयन स्नेहमयी दाखवले जातात. आणि शेरावली ही म्हटले जाते अर्थात विकारांच्या मोठ्या रूपावर विजय मिळवणे. आत्म्याची ही दुसरी शक्ती आहे.
    जगदम्बादेवी (सहनशक्ती) :
    आज प्रत्येकाकडे ‘मी किती सहन करू, कोणा कोणाचे सहन करू. कुठपर्यंत करू…’ असे अनेक प्रश्न सहन करण्याला घेऊन आहेत. पण आपण तेव्हा सहन करतो जेव्हा आपल्याकडे दुसरा कोणता मार्ग नसतो. ज्या लोकांबरोबर आपण राहतो त्यांना सोडू शकत नाही, जॉब दुसरा मिळू शकत नाही… अशा जेव्हा समस्या आपल्यासमोर असतात तेव्हा आपण सहन करतो. पण सहन करणे म्हणजे झालेल्या गोष्टीना मनापासून विसरणे. सहनशक्तीचे प्रतिक जगदम्बादेवीला दाखवले जाते. सहन करण्यासाठी आपली स्थिती आई समान बनवण्याची आवश्यकता आहे. आई जसे मुलाच्या सर्व गोष्टीना स्वीकार करते; पण त्याचबरोबर परिवर्तन करण्याची शक्तीसुद्धा असते; तसेच जेव्हा आपण प्रसंगांना घेऊन करू तेव्हाच आपण सहन करून सर्वांचा स्वीकार करू शकतो.
    संतोषीमाता (सामावून घेण्याची शक्ती) :-
    आपल्यामध्ये सर्व शक्ती आहेत पण सर्वांचाच वापर करत नाहीत पण या सर्व आत्म्याच्या शक्ती आहेत. सामावून घेणे म्हणजे नक्की काय? कधी कधी लोकांना असे वाटते कि जे जसे आहेत मग कोणी चुकीचे वागत असेल तरी त्याला सामावून घ्या, पण तसे नाही. आपल्याला माहित आहे कि सर्वांचे संस्कार वेगळे आहेत, ते भिन्न असले तरी त्याच्या गोष्टीना पकडून न ठेवणे. मनामध्ये हे असे का,कशाला, कुठे, केव्हा… अशा प्रश्नांची रांग लागते. पण प्रॉब्लेमचे चिंतन करण्यापेक्षा जे जसे आहे त्याला स्वीकार करून पुढे समाधान शोधणे. ही शक्ती धारण करण्यासाठी संतुष्टतेचा गुण आणावा. म्हणून ह्या शक्तीला संतोषीमातेच्या रुपामध्ये दाखवले आहे. जिच्या हातामध्ये तांदूळ दाखवले जातात. जी व्यक्ती समाधानी आणि सर्वांना सामावून घेते तीच आपल्या जीवनामध्ये संतुष्ट राहू शकते.
    गायत्री देवी (पारखशक्ती) :
    आपल्यासमोर एखादी समस्या आली तर आपण दहा लोकांना विचारतो कि काय करायला हवे? म्हणजेच पारखण्याची शक्ती नाही. जेव्हा व्यक्ती स्वतःला समजून घेतो, लक्ष स्वतःवर ठेवतो तेव्हा त्याच्यामध्ये चांगले-वाईटची समज वाढते. व्यक्ती, परिस्थितीचे फक्त बाह्य रूप न बघता त्याचा खोलवर विचार करतो. म्हणून गायत्रीदेवी दाखवली जाते. जिच्या हातामध्ये स्वदर्शन चक्र, शंख, हंस आसन दाखवले जातात. स्वदर्शन म्हणजे प्रत्येक घटनेमध्ये स्वतःवर लक्ष ठेवून आपल्या व्यवहाराला नियंत्रित केले, ज्याच्या कर्मांमध्ये कोणत्याही प्रकारचे मिश्रण नाही त्याची बुद्धी शुद्ध पवित्र असते. अश्या व्यक्तींचे जीवन सर्वाना प्रेरणा देणारे ठरते. गायत्री देवीचे वाहन हंस दाखवला जातो. हंस मोतीचा स्वीकार करतो. अर्थात शुद्ध बुद्धी चांगले आत्मसात करून वाईटाचा त्याग करते.
    सरस्वतीदेवी (निर्णय करण्याची शक्ती) :
    अचूक पारखता आले तर निर्णय करणे सहज होते. प्रत्येक निर्णय आपल्या जीवनावर परिणाम करतो . म्हणून कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करावा. त्याचबरोबर आपण दुसऱ्यांच्या जीवनाचे निर्णय घेऊ नये कारण प्रत्येकाची क्षमता वेगळी आहे. सल्ला अवश्य द्यावा पण अट्टाहास नसावा. प्रत्येकाचे भाग्य वेगळे आहे, या कर्म सिद्धांताला लक्षात ठेवावे. म्हणून या शक्तीचे प्रतिक सरस्वती देवीला दाखवले आहे जिच्या हातामध्ये वीणा आहे. आपल्या जीवनाची स्क्रिप्ट स्वतः लिहिणारे, स्वतःचे निर्णय स्वतः घेणारे त्याचबरोबर मिळून-मिसळून राहणारे असे संतुलित जीवन दिसून येते. म्हणून सरस्वतीदेवीच्या हातामध्ये माला दाखवली आहे.
    कालीदेवी (सामना करण्याची शक्ती) :
    या शक्तीला कालीदेवीच्या रुपामध्ये दाखवले जाते. ही शक्ती आपल्याला अन्याय, चुकीच्या गोष्टींचा सामना करायला शिकवते. जसे काळीदेवीचे रूप भयंकर दाखवले जाते कारण ही शक्ती सर्वप्रथम आपल्या कमीना समाप्त करण्याची प्रेरणा देते. म्हणून कालीदेवीच्या गळ्यामध्ये असुरांची मुंड माला दाखवली आहे तसेच हातामध्ये असुराचे डोके. अर्थात सर्व कमींचे मूळ समाप्त करणे आवश्यक आहे ते म्हणजे देहअभिमान. हा विकार जर राहिला तर त्याच्यापाठी सर्व विकार पुन्हा जन्म घेऊ शकतात
    लक्ष्मीदेवी ( सहयोग शक्ती) :
    जर या सात शक्ती आपल्यामध्ये आल्या तर आपण घेऊन करून कठीण परिस्थितीमध्ये अचूक निर्णय करणे, सहन करणे …. या सर्व गोष्टी सहज करू लागतो व सर्वांना सहयोग देतो. म्हणून या शक्तीचे प्रतिक लक्ष्मी देवी दाखवली आहे. कमलासिनी अर्थात या कलियुगामध्ये राहून स्वतःला अलिप्त ठेवणे. प्रत्येक संकल्प, बोल, कर्म पवित्र आणि सुखदायी बनवणे. लक्ष्मीदेवीचे हात वरदानी, धन देताना दाखवतात म्हणजेच जी आत्मा भरपूर व शक्तिशाली आहे तीच निस्वार्थ राहून देऊ शकते.
    अश्याप्रकारे या सर्व शक्तींचे महत्व समजून मेडिटेशनच्या अभ्यासाने या शक्तींना आत्मसात करू या. ईश्वराकडून शक्ती घेऊन आपण स्वतःला शक्तिशाली बनवूया. – नीता बेन