बँक बुडाली तरी मिळणार पाच लाख रुपये; बँक खातेदारांना मोठा दिलासा

दिवळखोरीमुळे सध्या अनेक बँका देशोधडीला लागल्या आहेत. यामुळे बँक खातेदारांना आर्थिक  अडचणींचा सामना करावा लागतो. यावर अर्थसंकल्पात विशेष तरतुद करण्यात आली आहे. बँक बंद झाल्यास किंवा बुडल्यास, 5 लाखांपर्यंतची ग्राहकांची रक्कम सुरक्षित असेल. ठेवीदारांना ही रक्कम 90 दिवसांच्या आत मिळेल. सध्या ग्राहकांची बँकेत एक लाखापर्यंतची रक्कम सुरक्षित राहत होती.

    मुंबई : बँक बुडाली तरी खातेधारकांना पाच लाख रुपये मिळणार आहेत. ठेवी विम्याची मर्यादा 5 पट वाढवण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाने डिपॉझिट इंश्योरेंस अँड क्रेडिट गॅरंटी कॉरपोरेशन अॅक्ट (DICGC) दुरुस्ती विधेयकास मान्यता दिली आहे. या विधेयकाच्या मंजुरीनंतर खातेधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, त्याला संसदेची मंजुरी मिळणे बाकी आहे.

    दिवळखोरीमुळे सध्या अनेक बँका देशोधडीला लागल्या आहेत. यामुळे बँक खातेदारांना आर्थिक  अडचणींचा सामना करावा लागतो. यावर अर्थसंकल्पात विशेष तरतुद करण्यात आली आहे. बँक बंद झाल्यास किंवा बुडल्यास, 5 लाखांपर्यंतची ग्राहकांची रक्कम सुरक्षित असेल. ठेवीदारांना ही रक्कम 90 दिवसांच्या आत मिळेल. सध्या ग्राहकांची बँकेत एक लाखापर्यंतची रक्कम सुरक्षित राहत होती.

    बुडालेल्या बँकांच्या कर्जाचे व्यवस्थापन करण्यासाठी एक कंपनी स्थापन करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. केंद्र सरकारने विम्याची रक्कम 1 लाखांवरून 5 लाखांपर्यंत वाढवली आहे. यामुळे ग्राहकांनी बँकेत पैसे ठेवले तर 5 लाख रुपये मिळणार आहेत. यामुळे बँका बंद झाल्यावर ग्राहकांचे नुकसान भरून काढता येणार आहे.

    याआधी बँकेत ठेवलेल्या पैशांवर एक लाखाचा विमा मिळत होता. आता या विम्याची रक्कम पाच लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे बँक बुडाली तरी खातेदारांना दिलासा मिळणार आहे.

    अर्थसंकल्पात बँकांच्या पुनर्पूंजीकरणासाठी 20 हजार कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. म्हणजेच सरकार बँकांना 20 हजार कोटींचे भांडवल देणार आहे.