Indians take out Chinese bust! Boycott on Chinese goods; A blow of Rs 50,000 crore

दिवाळीपूर्वीच भारतीयांनी चीनला दिवाळखोरीत लोटले आहे. दिवाळीपूर्वी चीनला मोठा झटका बसला असून चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकल्यामुळे ड्रॅगनचे 50 हजार कोटींचे नुकसान झाले आहे(Boycott on Chinese goods; A blow of Rs 50,000 crore).

    दिल्ली : दिवाळीपूर्वीच भारतीयांनी चीनला दिवाळखोरीत लोटले आहे. दिवाळीपूर्वी चीनला मोठा झटका बसला असून चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकल्यामुळे ड्रॅगनचे 50 हजार कोटींचे नुकसान झाले आहे(Boycott on Chinese goods; A blow of Rs 50,000 crore).

    कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने दिलेल्या माहितीनुसार, चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या आवाहनामुळे या सणासुदीच्या हंगामात चीनच्या व्यापारात 50 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे, तर या काळात देशांतर्गत विक्री वाढणार असल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत दोन लाख कोटींची वाढ होईल.

    भारतीय वस्तूंची मागणी वाढणार

    गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही कॅटने चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची हाक दिली असून देशातील व्यापारी आणि आयातदारांनी चीनमधून होणारी आयात बंद केली आहे, त्यामुळे या दिवाळी सणासुदीत चीनला सुमारे 50 हजार कोटींचे नुकसान होणार आहे. आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे, गेल्या वर्षीपासून ग्राहकही चिनी वस्तूंच्या खरेदीत रस घेत नाहीत, त्यामुळे भारतीय वस्तूंची मागणी वाढण्याची शक्‍यता आहे.

    दरवर्षी होत होती 70 हजार कोटींची आयात

    अनेक राज्यांतील 20 शहरांमध्ये नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून हे तथ्य समोर आले आहे की, या वर्षी आतापर्यंत अनेक भारतीय व्यापारी किंवा आयातदारांकडून चीनमध्ये दिवाळीच्या वस्तू, फटाके किंवा इतर तत्सम वस्तूंची ऑर्डर देण्यात आलेली नाही आणि यंदाची दिवाळी पूर्णपणे भारतीय दिवाळी म्हणून साजरी केली जाईल.

    नवी दिल्ली, अहमदाबाद, मुंबई, नागपूर, जयपूर, लखनौ, चंदीगड, रायपूर, भुवनेश्वर, कोलकाता, रांची, गुवाहाटी, पाटणा, चेन्नई, बंगळूर, हैदराबाद, मदुराई, पॉंडिचेरी, भोपाळ आणि जम्मू आहेत. दरवर्षी राखी ते नवीन वर्ष या पाच महिन्यांच्या सणासुदीच्या काळात भारतीय व्यापारी आणि निर्यातदार चीनमधून सुमारे 70 हजार कोटी रुपयांच्या वस्तूंची आयात करतात.

    ग्राहकच नाही

    यावर्षी राखी सणाच्या वेळी चीनमध्ये सुमारे 5000 कोटी रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे आणि गणेश चतुर्थीला 500 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आता दिवाळीतही हाच ट्रेंड दिसून येतो. हे स्पष्टपणे सूचित करते की, केवळ व्यापारीच चिनी वस्तूंवर बहिष्कार घालत नसून, ग्राहकही चीनमधून बनवलेल्या वस्तू विकत घ्यायला तयार नाहीत, असे कॅटचे अध्यक्ष बी. सी. भरतिया म्हणाले.