भारतात विश्वचषक स्पर्धा खेळण्यासाठी पाक क्रिकेट बोर्ड आयसीसीकडे करणार मागणी

सध्या भारत आणि चीनप्रमाणेच, भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत राजकीय संबंधाचा फटका क्रिकेट स्पर्धेला बसला आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ एकमेकांशी क्रिकेट मालिका खेळत नाहीत. तसेच भारताचा व्हिसा

सध्या भारत आणि चीनप्रमाणेच, भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत राजकीय संबंधाचा फटका क्रिकेट स्पर्धेला बसला आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ एकमेकांशी क्रिकेट मालिका खेळत नाहीत. तसेच भारताचा व्हिसा मिळवण्यासाठी त्यांना अनेक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे भारतात २०२१ टी-२० विश्वचषक आणि २०२३ मध्ये वन-डे विश्वचषक या दोन स्पर्धांना यजमानपद मिळाले आहे. परंतु या स्पर्धेत पाकिस्तान संघाला सहभागी होण्यासाठी, कोणत्याही प्रकारचा व्हिसा प्रोब्लेम होणार नाही, असं लिखीत आश्वासन देण्याची मागणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीला केली आहे. 

सध्या कोरोनामुळे बहुतांश क्रीडास्पर्धा बंद असल्या तरीही, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याआधीच्या अनुभवांमधून शहाणं व्हायचं ठरवलं. २०२१ च्या विश्वचषकाचं यजमानपद कोणाकडे द्यायचं याबद्दल आयसीसीने अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. परंतु पाकिस्तानीकडून भारतावर होणारे दहशतवादी हल्ले याचं कारण देत भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.