ठरलेलं लग्न मोडलं, टिळाच्या कार्यक्रमाचा खर्चासाठी तगादा; मुलानं व्हिडीओ व्हायरल करत केली आत्महत्या!

घडलेला सर्व प्रकार हा आपल्यामुळे झाला असं शल्य श्रीहरीच्या मनात होते. यामुळे त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत आईवडिलांची माफी मागतली, आणि आत्महत्या केली.

    लातूर:  कुठल्या गोष्टीवरुन मानसिक त्रास झाल्याने आयुष्य संपवण्याचं प्रमाण तरुणांमध्ये हल्ली वाढत चाललेलं दिसत आहे. लातुरमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका युवकाचं लग्न जमल्यानंतर ते मोडलं त्यामुळे मुलीच्या घरच्यांनी टीळाच्या कार्यक्रमासाठी खर्च झालेले पैसै परत मागण्याचा तगादा लावला. याला कंटाळून या युवकाने आत्महत्या (youth Commit Suicide) केली. श्रीहरी विठ्ठल पाटोळे (वय, 27) असं मृत तरुणाचं नाव आहे, त्याने आत्महत्या करण्यपुर्वी एक व्हि़डिओ व्हायरल केला.

    नेमका प्रकार काय?

    लातूर जिल्ह्यातील जढाळा या गावात श्रीहरी विठ्ठल पाटोळे या तरुणाने व्हिडीओ व्हायरल करत गळफास घेऊन आत्महत्या केली. 20 सप्टेंबर रोजी ही घटना उघडकीस आली. आत्महत्या केलेल्या तरुणाच्या वडिलांच्या तक्रारीवरून दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटकही करण्यात आली आहे.

    जुळलेलं लग्न मोडलं

    काही दिवसापुर्वी श्रीहरी विठ्ठल पाटोळे या तरुणाचे सुमनवाडी येथील श्रीमंत देवळकर यांच्या मुलीशी ठरले. काही दिवसांनी दोन्ही कुटुंबिायांच्या संमत्तीने टीळाचा कार्यक्रमही पार पडला. मात्र, दुसऱ्या दिवशी श्रीहरी पाटोळे यांनी घरच्यांना सांगितलं की मला लग्न करायचं नाही. पाटोळे कुटुंबियांनी हा निरोप देवळकर कुटुंबीयांना दिला. मात्र, लग्नास नकार यामुळे देवळकर कुटुंबीय नाराज झाले होते. लग्नास नकार का दिला हे वांरवांर विचारत होते तसेच, टिळा लावण्याच्या कार्यक्रमात झालेला खर्च द्या म्हणून तगादा लावला होता. यामुळे श्रीहरीच्या कुटुंबीयांना मनस्ताप सहन करावा लागला होता.

    व्हिडिओ व्हायरल करत आत्महत्या

    घडलेला सर्व प्रकार हा आपल्यामुळे झाला असं शल्य श्रीहरीच्या मनात होते. यामुळे त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत आईवडिलांची माफी मागतली. ‘आई पप्पा मला माफ करा. मला मुलगी पसंत नाही म्हणालो. यामुळे ते पैसे मागत आहेत. म्हणून मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेत आहे …मला माफ करा.’ हा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली.

    मुलीच्या कुंटुबिंयामधील दोघांवर गुन्हा दाखल

    या घटनेनंतर मृत श्रीहरीचे वडील विठ्ठल पाटोळे यांनी मुलीचे मामा आणि वडिलांविरोधात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरुन किनगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीचे मामा आणि मुलीचे वडील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून. त्या दोघांना किनगाव पोलिसांनी अटक केली आहे.