Conspiracies are being hatched to carry out a major terrorist attack like 26/11 in the country; Exciting claim

देशात 26/11 सारखा दहशतवादी हल्ला घडविण्यासाठी कट रचला जात असल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) आलेल्या फोनवरून करण्यात आला आहे. देशात मोठा दहशतवादी हल्ला होऊ शकतो. 26/11 सारख्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचला जात आहे, असे फोन करणाऱ्याने सांगितले. दरम्यान, एनआयएने या प्रकरणी कारवाई सुरू केली आहे. पश्चिम बंगालमधील रानाघाट येथून हा कॉल आला असल्याचे सांगण्यात आले आहे. यानंतर सुरक्षा यंत्रणांना सतर्क केले गेले आहे.

    दिल्ली : देशात 26/11 सारखा दहशतवादी हल्ला घडविण्यासाठी कट रचला जात असल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) आलेल्या फोनवरून करण्यात आला आहे. देशात मोठा दहशतवादी हल्ला होऊ शकतो. 26/11 सारख्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचला जात आहे, असे फोन करणाऱ्याने सांगितले. दरम्यान, एनआयएने या प्रकरणी कारवाई सुरू केली आहे. पश्चिम बंगालमधील रानाघाट येथून हा कॉल आला असल्याचे सांगण्यात आले आहे. यानंतर सुरक्षा यंत्रणांना सतर्क केले गेले आहे.

    3 जून रोजी आलेल्या कॉलवर या व्यक्तीने माहिती दिली की, हल्ल्यासाठी स्टील बुलेट आणि आयईडी नेपाळ आणि बांग्लादेशमार्गे तस्करी करून आणण्यात आले आहे. येत्या काही काळातच मोठा हल्ला होऊ शकतो. दावा केला जात आहे, की या दहशतवादी हल्ल्यासाठी 26/11 सारखाच कट रचला जात आहे. एनआयएकडे आलेल्या मोबाईल नंबरच्या माध्यमातून याप्रकरणाचा तपास केला जात आहे.

    मागील वर्षी 20 ऑक्टोबरलाही एनआयएच्या कंट्रोल रूममध्ये कॉल आला होता. कॉल करणाऱ्या व्यक्तीने, तो पाकिस्तानच्या कराचीमधून बोलत आहे. त्याने मुंबई विमानतळ आणि इंडियन पोलीस एस्टॅब्लिशमेंटवर एक मोठ्या हल्ल्याची तयारी सुरू असल्याचे म्हटले होते. जेएमबी म्हणजेच जमात उल मुजाहिद्दीन बांगलादेशचे पश्चिम बंगालमध्ये एक चांगले नेटवर्क आहे जे जागतिक दहशतवादी संघटना अल कायदाशी संबंधित आहे.

    यासोबतच कॉलरने तस्करीसाठी बांगलादेशातील मार्गाचाही उल्लेखही केला आहे. अशा परिस्थितीत एनआयए जेएमबीच्या अँगलनंही याप्रकरणाचा तपास करू शकते. दहशतवादी बऱ्याच दिवसांपासून देशाच्या विविध भागात हल्ल्याचे कट रचत होते, पण गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणांच्या तत्परतेमुळे ते कोणताही मोठा हल्ला करण्यात अपयशी ठरले आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एनआयएने पश्चिम बंगालमधील 6 दहशतवाद्यांसह अल कायदाच्या एकूण 9 कार्यकर्त्यांना अटक केली होती.

    हे सुद्धा वाचा