नवी दिल्ली: केंद्र सरकारने तयार केलेलया तीन कृषी कायद्यांच्या विरोधात देशातील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आज तब्बल चार महिने पूर्ण होत आहे. चार महिन्यानंतरही सरकारने कायदेमागे घेण्याबाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला नसल्याचे निषेध व्यक्त करण्यासाठी दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलकांनी पुकारलेल्या बंदचे पडसाद दिसू लागले आहेत.
दिल्ली-गाझीपूरवरील हायवे केला बंद
गाझीपूर सीमेवर शेतकरी आंदोलनाला बसल्याने पोलिसांनी वाहतूक बंद ठेवली आहे. शेतकरी रस्त्यावर बसून आंदोलन करत आहेत. दिल्लीच्या ज्या सीमांवरआंदोलन सुरु आहे त्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत संयुक्त मोर्चाचे नेते बलबीर सिंग राजेवाल यांनी सांगितले की, रस्ते आणि रेल्वे वाहतूक बंद केली जाणार आहे. बाजारदेखील बंद केले जाणार असल्याचे माहिती त्यांनी दिली आहे.
Protesters block the Ghazipur border (Delhi-UP border) in view of 12-hour ‘Bharat Bandh’ call by Samyukt Kisan Morcha against Centre’s Farm Laws pic.twitter.com/JnmmPXixJd
— ANI (@ANI) March 26, 2021
संयुक्त किसान मोर्चाचे नागरिकांना बंद यशस्वी करण्याचे केले आवाहान
शेतकरी आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावण्याचे काम करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चा या शेतकरी आंदोलक संघटनेनें नागरिकांना बंद यशस्वी करण्याचे केले आवाहान केले आहे. केंद्रसरकारने बनवलेल्या काळया तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आज चार महिने पूर्ण होत आहेत. सरकारचा निषेध म्हणून आज पुकारण्यात आलेल्या बंदला यशस्वी करावे असे आवाहन शेतकरी नेते बुटासिंग बुर्जगिल यांनी केले आहे.