परराज्यात सुरू असणाऱ्या मालिकांच्या शुटींगला लवकरच महाराष्ट्रात मिळणार परवानगी!

शुटींगवर सुद्धा बंदी आली होती. त्यामुळे मुंबईमध्ये सुरु असणाऱ्या कित्येक मालिकांना शुटींगसाठी परराज्यात धाव घेतली होती.

    मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अनलॉकबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात अनलॉक, लॉकडाऊन संदर्भात ५ टप्प्यात निर्णय घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मुंबई शहर आणि उपनगराचा समावेश आहे. त्यामुळे लवकरच शुटींग सुरु होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    महाराष्ट्रामध्ये कोरोनाने अक्षरशः थैमान घातलं होतं. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत होती. तर दुसरीकडे मृतांचा आकडा वाढत होता. त्यामुळे परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महराष्ट्रात लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता. त्यामुळे अत्यावशक सेवा वगळता इतर सर्व सेवा सेवा बंद करण्यात आल्या होत्या. यामध्ये शुटींगवर सुद्धा बंदी आली होती. त्यामुळे मुंबईमध्ये सुरु असणाऱ्या कित्येक मालिकांना शुटींगसाठी परराज्यात धाव घेतली होती.  

    २ ऱ्या टप्प्यात मुंबई शहर आणि उपशहराचा समावेश आहे. त्यामुळे अनलॉक झाल्यानंतर शुटींगवरचे निर्बंधसुद्धा हटवण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात प्रामुख्याने मुंबई शहर आणि उपनगरमध्येचं अनेक मालिकांचं शुटींग चालत. त्यामुळे मालिकांना नक्कीच दिलासा मिळणार आहे