rakhi sawant

भारती सिंहवर झालेल्या कारवाईवर बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतने(rakhi sawant rection about bharti singh drug connection) वक्तव्य केले आहे. देशात ड्रग्ज काय फक्त कलाकारच घेतात का? असा प्रश्न राखीने विचारला आहे.

एनसीबीने कॉमेडियन भारती सिंह(bharti singh)हिच्या घरी छापा मारला. तिच्या घरात अंमली पदार्थ आढळून आल्यानंतर एनसीबीने तिला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. चौकशीत भारतीने अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबुली दिल्याने एनसीबीने तिच्यावर ‘एनपीडीएस’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केले होते. दरम्यान तिचा जामीन अर्ज मंजूर झाला आहे. भारती सिंहवर झालेल्या कारवाईवर बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतने(rakhi sawant reaction about bharti singh drug connection) वक्तव्य केले आहे.

विरल भयानीने राखी सावंतचा एक व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यात तिने भारती सिंह प्रकरणावर आपले मत व्यक्त केले आहे. तिने असे म्हटले आहे की, सध्या अनेकांच्या घरी अचानक छापा टाकला जातो. त्यांच्याकडे ड्रग्ज असल्याची टीप कोण देतं ? फोन करुन कोण माहिती देत आहे का? याबद्दल मला काहीही माहिती नाही. मात्र मला असा प्रश्न पडतो की फक्त कलाकारांवरच कारवाई का केली जाते ? कुठल्या मंत्र्यांचा मुलगा का पकडला जात नाही? देशात फक्त कलाकारच ड्रग्ज घेतात का? दुसंर कोणी  का पकडलं जात नाही ?

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


पुढे ती म्हणते,‘मला हा फंडा समजत नाही. सर्वात आधी भारतीसोबत असं काही होऊ शकतं यावर माझा विश्वासच बसतं नाही. ती भारतातली लोकप्रिय कॉमेडियन आहे.हे कोणाचे तरी षडयंत्र आहे. भारती आणि हर्ष माझे चांगले मित्र आहेत. कुणीतरी त्यांच्या घरी ड्रग्ज ठेऊन फोन केला आहे.