पुन्हा रहस्य उलगडणार, ‘रात्रीस खेळ चाले 3’ चे नवे एपिसोड लवकरच!

मालिकेतील अण्णा, शेवंता, माई, पासून सुसल्या आणि पांडूपर्यंत सर्वच कलाकारांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. मालिकेला मिळालेलं प्रचंड यश आणि चाहत्यांकडून होतं असलेली मागणी यामुळे मालिकेचे ३ भाग आला आहे.

    झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा चाहत्यांची लाडकी बनली आहे. या मालिकेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागाच्या प्रचंड यशानंतर मालिकेचा तिसरा भागसुद्धा काही महिन्यांपूर्वीच आपल्या भेटीला आला होता. मात्र लॉकडाऊनमुळे मालिकेचं शुटींग बंद करावं लागलं होतं. त्यामुळे चाहत्यांचा चांगलाच हिरमोड झाला. मात्र आत्ता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच मालिकेचं शुटींग सुरु होणार आहे.

    मालिकेतील अण्णा, शेवंता, माई, पासून सुसल्या आणि पांडूपर्यंत सर्वच कलाकारांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. मालिकेला मिळालेलं प्रचंड यश आणि चाहत्यांकडून होतं असलेली मागणी यामुळे मालिकेचे ३ भाग आला आहे. काही राह्स्यांचा उलघडा होतं असतानाचं मालिकेचं शुटींग बंद करावं लागलं होतं. आता मालिकेचे नवे एपिसोड आपल्या भेटीला येणार आहेत.

    ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेचा लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता असणारा प्रल्हाद कुरतडकरनं याबद्दलची माहिती दिली आहे. प्रल्हादनं म्हटलं आहे. या मालिकेच्या तिसऱ्या भागात अनेक नवे बदल आहेत. मालिकेत काही वर्षाचं अंतर दाखवण्यात आल्याने अनेक बदलसुद्धा दिसून येत आहेत. या भागात अनेक रहस्यसुद्धा आहेत. त्यांचा उलघडा हळूहळू होतं आहे. मालिकेत सध्या अण्णा आणि शेवंता भूत म्हणून वावरत आहेत. त्यामुळे अजूनही नवे ट्वीस्ट पाहायला मिळणार आहेत.