
शिर्केपाटील कुटुंबात प्रत्येक समारंभ अगदी थाटामाटात पार पडतो. त्यामुळे ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’(Sukh Mhanje Nakki Kay Aste) मालिकेत जयदीप-गौरीचं लग्नही अगदी शाही थाटात पार पडणार आहे.
स्टार प्रवाहच्या(Star Pravah) ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Aste) मालिकेत गौरी-जयदीपने एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर आता ते पुन्हा विवाहबंधनात (Jaydeep Gauri Marriage) अडकणार आहेत.
शिर्केपाटील कुटुंबात प्रत्येक समारंभ अगदी थाटामाटात पार पडतो. त्यामुळे जयदीप-गौरीचं लग्नही अगदी शाही थाटात पार पडणार आहे. नऊवारी साडीत गौरीचं सौंदर्य आणखीनच खुलून आलंय. जयदीपही धोतर, फेटा अश्या पारंपरिक लूकमध्ये दिसणार आहे. माई-दादा गौरीला मुलीप्रमाणे मानतात.त्यामुळे लग्नात गौरीच्या आई-वडिलांची जबाबदारी माई-दादांनीच पार पाडली आहे.
या सगळ्यात विशेष लक्ष वेधून घेतंय ते गौरीचं मंगळसूत्र. जयदीपच्या प्रेमाची निशाणी असलेलं मोरपीस गौरीने लहानपणापासून जपून ठेवलं होतं. हीच निशाणी तिच्या मंगळसूत्रामध्येही जपली जाणार आहे.
जयदीप – गौरीची जोडी अनेक प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. त्यामुळे हा लग्न सोहळा प्रेक्षकांना नक्की आवडेल.