lata mangeshkar birthday

गोड आवाजामुळे लतादिदींची गाणी(Lata Mangeshkar Birthday 2021) आजही रसिकांना भुरळ पाडतात. त्यांच्या गोड आवाजामुळे त्यांना गानकोकिळा असे म्हटले जाते. त्यांनी मराठी, हिंदीसह विविध भाषांमध्ये लाखो गाणी गायली. हिंदी चित्रपटसृष्टीवर त्यांनी राज्य केलं.

    गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचा आज ९२ वा वाढदिवस(Happy Birthday Lata Mangeshkar) आहे. मात्र कोरोना काळामुळे त्या आपल्या वाढदिवस साजरा करणार नाहीत. लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदोरमध्ये(Lata Mangeshkar Birthday Special) झाला. लता मंगेशकरांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हेदेखील प्रसिद्ध संगातकार होते. त्यांचा गाण्याचा आणि संगीताचा वारसा त्यांच्या मुलांनी चालवला.

    गोड आवाजामुळे लतादिदींची गाणी आजही रसिकांना भुरळ पाडतात. त्यांच्या गोड आवाजामुळे त्यांना गानकोकिळा असे म्हटले जाते. त्यांनी मराठी, हिंदीसह विविध भाषांमध्ये लाखो गाणी गायली. हिंदी चित्रपटसृष्टीवर त्यांनी राज्य केलं. स्वातंत्र्यपूर्वकाळापासून गाणं म्हणणाऱ्या लतादीदींचे आजही पाकिस्तान आणि बांगलादेशात चाहते आहेत.

    दिवसभर गाण्याचा अभ्यास
    लता मंगेशकर आपलं गाणं सुधारण्यासाठी संपूर्ण दिवसभर गाण्याचा अभ्यास करायच्या. त्याकाळी साउंड रेकॉर्डिंग, मिक्सिंग यासारखी तंत्र विकसित नव्हती. त्यावेळी गाण्यांमध्ये इफेक्ट निर्माण करण्यासाठी वेगळं रेकॉर्डिंग केलं जात होतं. गाण्यात विशिष्ट इफेक्ट निर्माण करण्यासाठी गायकाला मेहनत घ्यावी लागत असे. लता दिदी यासाठी दिवसभर रियाज करायच्या.

    ‘महल’ मधील ‘आयेगा आने वाला’ या गाण्याने लता मंगेशकर यांना खूप प्रसिद्धी मिळवून दिली. फार कमी लोकांना माहिती आहे की या गाण्यातील आवाजाचा चढउतार कोणत्याही तंत्राच्या मदतीने तयार केला गेला नाही, तर तो एका विशेष प्रकारे रेकॉर्ड केला गेला. जर, तुम्हाला ते गाणे आठवत असेल, जेव्हा अशोक कुमार आरशासमोर उभे राहतात आणि गाणे सुरू होते, तेव्हा दुरून आवाज येऊ लागतो आणि नंतर तीन-चार ओळी नंतर ते जवळून आल्यासारखे वाटते. या प्रकारचा ध्वनी प्रभाव तंत्राच्या मदतीने तयार केला जाऊ शकतो, परंतु त्या वेळी गायकाला हे करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागत होती.

    एका दिवसात ८ गाणी रेकॉर्ड
    १९४८-४९ हे वर्ष असे आहे, जेव्हा लता मंगेशकर एका दिवसात आठ-आठ गाणी रेकॉर्ड करायच्या. त्या सकाळी दोन गाणी, दुपारी दोन गाणी, संध्याकाळी दोन गाणी आणि रात्री दोन गाणी रेकॉर्ड करायच्या. बऱ्याच वेळा असे घडायचे की, त्या सकाळी घरातून निघायच्या आणि रात्री उशिरा दोन-तीन वाजेपर्यंत घरी परतायच्या. खाण्यापिण्यासाठी देखील वेळ नव्हता. कधीकधी असे व्हायचे की गाण्याचे रेकॉर्डिंग व्हायचे आणि नंतर सांगण्यात यायचे की, रेकॉर्डिंग नीट झाले नाही, मग गायकाला पुन्हा बोलावले जायचे.

    भारतरत्न पुरस्काराने गौरव
    लता मंगेशकरांनी संगीत क्षेत्रात एक अढळ असं स्थान निर्माण केलं आहे. कारकिर्दीत लतादीदींना आतापर्यंत अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत. भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने २००१ मध्ये त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच आतापर्यंत ३ नॅशनल अवॉर्ड, पद्मभूषण, दादासाहेब फाळके आणि पद्मविभूषण हे पुरस्कार देऊनही गौरवण्यात आलं आहे.