sukh khanje nakki kay asta

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेच्या प्रोमोवरून नेटकऱ्यांनी अनेक संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

    ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’(Sukh Mhanje Nakki Kay Asta) या स्टार प्रवाहवरील मराठी मालिकेत वेगवेगळे ट्वीस्ट अँड टर्न्स येत असतात. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोला अनेक नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Star Pravah (@star_pravah)

    ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेच्या नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, शालिनी, देवकी आणि मल्हार हे जयदीपला एका खड्ड्यामध्ये पुरतायत. त्यानंतर गौरी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करते.ती बाप्पाला म्हणते की,‘बाप्पा जयदीपला माझ्यापासून लांब घेऊन जाऊ नको.’ यावर एक मुलगी तिथे येते आणि गौरीला म्हणते, ‘बाप्पाचा उंदीर मामा आहे ना तुला मार्ग दाखवायला’ त्यानंतर प्रोमोमध्ये एक उंदीर दिसतो. ‘बाप्पाचा उंदीर मामा दाखवणार गौरीला जयदीपपर्यंत पोहोचण्याचा मार्ग… ‘सुख म्हणजे नक्की काय असतं !’ असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे.

    या प्रोमोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, ‘दु:ख म्हणजेच हेच असतं- कळालं ऑडियन्सला . निरोप घ्या आणि प्रेक्षकांना सुखी करा. नवीन मालिकेला स्कोप द्या’ तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, ‘काय स्टोरी आहे व्वा! किती वेड्यात काढायचं?’

    एका नेटकऱ्यानं लिहीलं की, ‘अरे काय ही मालिका… किती वेळा जयदीप मरतो आणि किती वेळा जिवंत होतो…फालतू.’ तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, ‘तुमच्या मालिकेचा लेखक कुठे आहे? त्याचे पाय धरावेसे वाटतायत. देवाला पण नाही सोडत.’

    गिरीजा प्रभू (Girija Prabhu), मंदार जाधव (Mandar Jadhav) ,वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar), माधवी निमकर (Madhavi Nimkar) यांनी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली आहे. मालिकेतील गौरी जयदीप शिंदे (Gauri Jaydeep Shinde) ही भूमिका गिरीजानं साकारली आहे, तर जयदीप सूर्यकांत शिंदे ही भूमिका मंदार जाधवनं साकारली आहे. या मालिकेत अभिनेत्री माधवी निमकर शालिनी ही भूमिका साकारते. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहेत. या मालिकेच्या टायटल साँगला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या मालिकेच्या आगामी एपिसोडची अनेक प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.