सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर कंगना आणि शिवसेनेत रंगलेला सामना सगळ्यांनीच बघितला. नुकताच कुठे हा वाद शमला आहे. आता कंगना पुन्हा एकदा मुंबईत परतली आहे. मुंबईत येताच कंगनाने पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचलं आहे. पण कंगनाच्या ट्विटला उर्मिला मातोंडकरने उत्तर दिलं आहे.
सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर कंगना आणि शिवसेनेत रंगलेला सामना सगळ्यांनीच बघितला. नुकताच कुठे हा वाद शमला आहे. आता कंगना पुन्हा एकदा मुंबईत परतली आहे. मुंबईत येताच कंगनाने पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचलं आहे. पण कंगनाच्या ट्विटला उर्मिला मातोंडकरने उत्तर दिलं आहे.
कंगनाने मुंबईत येताच सिद्धिविनायक आणि मुंबा देवीचं दर्शन घेतलं. यावेळी कंगना हिरवी साडी, नाकात नथ आणि केसात गजरा अशा मराठमोळ्या वेशात आली होती. तसंच, प्रसार माध्यमांशी संवाद साधताना तिनं शिवसेनेवरही अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे. मुंबईत राहण्यासाठी केवळ गणपती बाप्पाच्या परवानगीची गरज आहे. मी इतर कोणाकडेही परवानगी मागितली नाहीये, असं म्हणत कंगनानं पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचलं आहे.
View this post on Instagram
माझ्या लाडक्या मुंबईसाठी उभे राहिल्यामुळे कंगनाचं हेच वाक्य पकडून उर्मिला यांनी कंगनाला टोला लगावला आहे. उर्मिला यांनी कंगनानं मुंबईबाबत केलेल्या ट्वीटवर ही प्रतिक्रिया दिली आहे.
“for standing up for my beloved city Mumbai “ ???
बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ…???— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) December 29, 2020
उर्मिला मातोंडकरांची टीका
“माझ्या लाडक्या मुंबईसाठी उभं राहिल्याबद्दल. बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ, असं खोचक ट्वीट उर्मिला यांनी केलं आहे.
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून मुंबई पोलिसांवर टीका व आरोप केल्यामुळं कंगना वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. तसंच, मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हटल्यानंतर कंगनावर राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातून टीकेची झोड उठली होती. यावर शिवसेनेनंही कंगनाला मुंबई पोलिसांची भीती वाटत असेल तर तिनं आपल्या राज्यात निघून जावं, असा इशारा दिला होता. नंतर कंगनाच्या ऑफिसची तोडही पालिका कर्मचाऱ्यांनी केली होती.