महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादामुळे राजकारण ढवळून निघालं आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावांना कर्नाटकमध्ये समाविष्ट करण्याचे प्रयत्न कर्नाटक सरकारकडून सुरु आहेत. अशातच महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी जतमध्ये जाऊन लोकांशी संवाद साधला आणि विविध घोषणाही केल्या.