स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त इस्लामपुरमधील (Islampur) बस आगारात आज उत्साहाचे वातावरण दिसून आले. आगारातील एसटी गाड्याही दिमाखात सजल्या आहेत. महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांना जोडणाऱ्या या लालपरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (Rashtrawadi Congress) प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सारथ्य केले.