प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

राज्य शासनाने खबरदारी म्हणून सर्व जिल्हा प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या आहेत. जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी जिल्ह्यात संसर्ग जरी आटोक्यात असला तरी संसर्ग वाढण्याची शक्यता नाकरता येत नाही.

    गोंदिया (Gondia).  राज्य शासनाने खबरदारी म्हणून सर्व जिल्हा प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या आहेत. जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी जिल्ह्यात संसर्ग जरी आटोक्यात असला तरी संसर्ग वाढण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या नियमांना बगल देणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.

    राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. त्यामुळे राज्यात संसर्गाची दुसरी लाट सुरू झाल्याचे चित्र आहे. यावरून राज्य शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची खबरदारी घ्यावी, अशा सुचना केल्या आहेत. या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व आस्थपनांच्या ठिकाणी फिजिकल डिस्टान्सिंग, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर, गर्दी टाळणे या नियमांचे पालन होणे आवश्यक असल्याचा सुचना केल्या आहेत. ज्या ठिकाणी किंबहुना ज्या व्यक्तीकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांना बगल दिली जात आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचेही निर्देश दिले आहे. त्याचप्रमाणे दंडाची रक्कमही निश्चित करून दिली आहे.

    दंड व दंडाची कारणे आस्थपाने मालक किंवा संचालक यांनी मास्क न वापरल्यास 500 रुपये दंड, खासगी कर्मचाऱ्यांनी मास्क न वापरल्यास 200 रूपये दंड, हॉटेल, रेस्टारंटच्या कर्मचाऱ्यांनी मास्क न वापरल्यास 100 रुपये दंड व मालकास 500 रूपये दंड, मास्क न वापरणारे सर्वसामान्य नागरिकास 100 रुपये दंड, शासकीय कार्मचाऱ्यांना 500 रूपये दंड, आस्थपनाच्या ठिकाणी सॅनिटायझर किंवा हात धुण्याची व्यवस्था न ठेवल्यास 1 हजार रूपये दंड, कृउबासमध्ये मास्कसह इतर नियम न पाळल्यास सचिवावर 10 हजार रूपये दंड व दुकानदार विक्रेत्यास 200 रूपये दंड, 50 पेक्षा अधिक वऱ्हाडी आढळून आल्यास आयोजकावर 10 हजार रूपये दंड ठोठावला जाणार आहे.