फ़क्त चविष्ट आहे म्हणून खात असलेले खाद्य पदार्थ किती सुरक्षित?

लग्न, इतर समारंभ यात सतत जेवणाच्या पंगती उठत असतात. सकाळच्या चहासोबत बेकरीचे पदार्थ भारतामध्ये आवडीने खाल्ले जातात. आपल्या देशांत भाजीपाला उघड्याने रस्त्याच्या कडेला विकला जातो तर चपला बूट एसी दुकानात विकले जातात.

    भारतातील अन्नधान्याचा विचार केला असता भारत देशाने अन्नधान्य उत्पादन क्षेत्रात अत्यंत प्रगती केलेली आहे. भारतात अन्नधान्याचे प्रचंड उत्पादन होत असते; परंतु धान्य पिकवताना शेतामध्ये रासायनिक खते व कीटकनाशकांचा अमर्याद वापर केला जातो.या कीटकनाशकांचा, रसायनांचा प्रवेश अन्नधान्यांच्या माध्यमातून आपल्या शरीरात होत असतो. दररोज हजारो लोक उघड्यावरील अन्नपदार्थ खात असतात.

    लग्न, इतर समारंभ यात सतत जेवणाच्या पंगती उठत असतात. सकाळच्या चहासोबत बेकरीचे पदार्थ भारतामध्ये आवडीने खाल्ले जातात. आपल्या देशांत भाजीपाला उघड्याने रस्त्याच्या कडेला विकला जातो तर चपला बूट एसी दुकानात विकले जातात. ही शोकांतिका आहे.

    विषबाधेस कारण
    हॉटेलमध्ये, गाड्यावर खाताना पदार्थांची फक्त चव पाहिली जाते ते कसे बनवले जातात ते नाही. स्वयंपाकघर अस्वच्छ कर्मचारी तसेच अस्वच्छ भांडी असतात. शिवाय स्वयंपाक बनवणारे, दारू पिऊन तंबाखू चघळत, अपु-या जागेत घामाच्या धारात पदार्थ बनवणे सुरू असते. अन्नधान्य -भाज्यांची सफाई, धुलाई न करताच त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे मग आपल्याला अन्न विषबाधेचा  लोकांना त्रास होतो.

    अशुद्ध पिण्याचे पाणी
    अनेक ठिकाणी हॉटेलमधील अन्न साठवणीचे ठिकाणही अत्यंत गलिच्छ असते. कित्येक ठिकाणी झुरळे उंदरांचा सुळसुळाट असतो. याशिवाय पिण्याच्या पाण्याचे हाल अत्यंत वाईट असतात. पाण्याच्या टाक्या वर्षानुवर्षे धुतल्या जात नाहीत. त्या निर्जंतुक केल्या जात नाहीत. पाणी साठविण्याच्या पद्धती किंवा पाणी शुद्धीकरणाच्या पद्धती अत्यंत जुनाट आहेत.

    पालेभाज्यांना हिरवा रंग
    पालेभाज्यांनादेखील हिरवा रंग दिला जातो. हॉटेलमधील प्रत्येक मिठायामध्ये आजकाल साखरेऐवजी सॅकरीन नावाचा विषारी साखरेपेक्षा 1000 पट गोड पदार्थ वापरतात.

    भेसळीच्या पदार्थांचा वापर
    अन्न पदार्थांमध्ये सोडा, प्रिझर्वेटिव्ह, रंग वापरण्याचे काहीही नियम नाहीत किंवा प्रमाण नाही. भेसळयुक्त लाल तिखट, भेसळयुक्त हळद, रंग दिलेली बडीसोप, रंग मिसळलेली चहापत्ती हे प्रकार आता नित्याचेच झाले आहेत. आपल्याकडे काळीमिरीच्या ठिकाणी पपयाच्या बिया मिसळतात. केशरच्या ठिकाणी रंग दिलेल्या मक्याचे केस मिळतात. सणा-समारंभाच्या काळात वापरण्यात येणारे तेल-तूप-डालडादेखील बहुतांशी भेसळयुक्तच असते.

    फळांना सॅकरीनचे इंजेक्शन
    भेसळीत फळेदेखील सुटत नाहीत, टरबुजास रंगाचे व साखरेच्या द्रवणाचे इंजेक्शन देऊन ते लाल व गोड बनविले जातात. आंबे-केळी-चिक्कू ही अत्यंत विषारी केमिकलद्वारे पिकवले जातात. सफरचंदास वॅक्स लावून त्यास चमकवले जाते.