शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ अखिलेश यादवांचे ररस्त्यांवरच धरणे आंदोलन ; पोलिसांनी घेतले ताब्यात

कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ धरणे आंदोलन करणाऱ्या अखिलेश यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे. अखिलेश यादव घरात नजरकैदेत होते व घराभोवती बॅरिकेडिंग होते, मात्र असे असूनही कन्नौज अनेक समर्थकांसह अखिलेश बाहेर पडले. पोलिसांनी त्याला पुढे जाण्यापासून रोखले, तेव्हा ते रस्त्यातच धरणावर बसले. समर्थकांची वाढती गर्दी पाहून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याचे स्पष्ट आहे. अटकेनंतर सपाच्या खासदाराने लोकसभेच्या सभापतींना पत्र लिहून आपल्या हक्कांचे उल्लंघन केल्याची तक्रार केली आहे.
शेतकरी केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करीत आहेत.शेतकरी समर्थनार्थ अखिलेश यादव यांनी किसान यात्रा जाहीर केली होती. सोमवारी त्यांनी ट्वीट केले, ‘कदम-कदम बढ़ाए जा, दंभ का सर झुकाए जा, ये जंग है जमीन की, अपनी जान भी लगाए जा’, किसान यात्रेसंदर्भात सरकारने सर्व जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला होता.

वाहने थांबविली असता, पायी चालण्यास सुरुवात
समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते . त्याच्या घराभोवतीचे रस्ते बॅरिकेडिंगने बंद केले होते. कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. असे असूनही, सर्व समर्थकांसह ते कन्नौज येथून पायी निघायला लागले. अखिलेश यादव यांना पोलिस दलाने रोखले असता त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडत धरणे आंदोलन केले. गर्दी वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी अखिलेश यांच्यासह अनेक सपा नेत्यांना व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची वाहनेही जप्त केली असल्याचा आरोप अखिलेश यांनी केला आहे