आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची नार्कोटेस्ट करण्याची मागणी

  • भाजपची मागणी

पाटणा. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणावरून वादळ उठले आहे. यातच आता अदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची सीबीआय चौकशी व्हावी आणि दोन्ही नेत्यांची नार्कोटेस्टही करण्याची मागणी अशी मागणी भाजपचे प्रवक्ते निखिल आनंद यांनी केली आहे. यासोबतच त्यांनी पुरावे नष्ट केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.  उल्लेखनीय असे की, शिवसेनेने  सुशांतचे वडील के.के सिंह, भाजप आणि बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडेय यांच्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. याच पार्श्वभूमीवर निखिल आनंद यांनी शिवसेनेवर पलटवार केला.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत असताना फक्त आदित्य ठाकरेंनी स्पष्टीकरण दिले आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनीही या प्रकरणावर मत व्यक्त करावे. महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण खेळले जात आहे. पुरावे मिटविण्याचे षडयंत्र रचले जात आहे. सीबीआयने या गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावे.

निखिल आनंद, प्रवक्ते भाजप