आमचं ठरलंय – व्होडाफोन आयडियाचा बीएसएनएलसोबत विलीनीकरणाचा प्रस्ताव रद्द

व्होडाफोन आयडिया(VI) कर्जबाजारी कंपनी आहे. कंपनीला खूप तोटा होत आहे. त्यामुळे व्होडाफोन आयडीया बीएसएनएलमध्ये (Vodafone Idea Merger In BSNL)विलीन करण्याचा  प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे.

    व्होडाफोन आयडिया(Vodafone Idea Limeted) लिमिटेड कंपनीला सरकारी दूरसंचार कंपनी असलेल्या बीएसएनएल(BSNL) एमटीएनएलमध्ये(MTNL) विलीन(Merging) करण्याचा निर्णय सध्या तरी होणार नाही. व्होडाफोन आयडियाचे कुमार मंगलम बिर्ला यांच्या वक्तव्यानंतर केंद्र सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बिर्ला यांनी कंपनीचा २७ टक्के हिस्सा सोपवून आणि राष्ट्रहीत साधून व्होडाफोन आयडिया लिमिटेड वाचवण्याबद्दल भाष्य केलं होतं. मात्र निती आयोगाचा याला विरोध आहे.

    व्होडाफोन आयडिया कर्जबाजारी कंपनी आहे. कंपनीला खूप तोटा होत आहे. त्यामुळे व्होडाफोन आयडीया बीएसएनएलमध्ये विलीन करण्याचा  प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या कंपन्यांना विलीन केलं तर गोंधळ होईल. जर या कंपन्या एकत्र आल्या तर सरकारी तिजोरीवर भार पडेल. अकार्यक्षम खासगी संस्थेसाठी इतका विचार करण्याऐवजी सरकार फक्त बीएसएनएल आणि एमटीएनएलवर लक्ष केंद्रीत करेल.

    देशातील सरकारी दूरसंचार कंपन्यांना वाचवण्यासाठी केंद्र सरकारने २०१९ मध्ये ६९ हजार कोटींचं पॅकेज दिलं होतं. यानंतर बीएसएनएल आणि एमटीएनएलसाररख्या सरकारी कंपन्या नफा कमवण्यासाठी धडपडत आहेत. दूरसंचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना राज्यसभेत सरकारी दूरसंचार कंपन्यांची स्थिती मांडली होती. त्यात आर्थिक वर्ष २०२१ अखेरपर्यंत बीएसएनएलची एकूण थकबाकी ८१,१५६ कोटी रुपये आहे. तर एमटीएनएलची एकूण थकबाकी २९,३९१ कोटी होती, अशी माहिती मिळाली आहे.

    व्होडाफोन आयडियाचे देशात कंपनीचे २७ कोटी युजर्स आहेत. व्होडाफोन आयडियावर सरकारचं ९६,३०० कोटींचं कर्ज आहे. त्याचबरोबर एजीआरच्या ड्यूजच्या स्वरुपात ६१ हजार कोटींचं कर्ज आहे. व्होडाफोन आयडियाला बँकांचं २३ हजार कोटी देणं आहे. तर कंपनीला ७ हजार कोटींच्या पार नुकसान होत आहे.