गेल्या २४ तासांमध्ये देशात ३० हजार ९४१ नव्या रुग्णांची(Corona patients In India) नोंद झाली होती.यामध्ये केरळमध्येच(Keral) १९,६२२ म्हणजे साधारण दोन तृतीयांश नवे रुग्ण सापडले आहेत.
नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांमध्ये कालच्या तुलनेत नव्या कोरोनाबाधितांच्या(Corona patients) संख्येत १२ हजारांनी घट झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात ३० हजार ९४१ नव्या रुग्णांची नोंद झाली होती.यामध्ये केरळमध्येच(Keral) १९,६२२ म्हणजे साधारण दोन तृतीयांश नवे रुग्ण सापडले आहेत. तसेच केरळ राज्यामध्ये १३२ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. कालच्या दिवसात देशात ३५० जणांचा कोरोनामुळे मृत्यू (Death By Corona)झाला आहे.
India reports 30,941 fresh COVID-19 cases, 36,275 recoveries, and 350 deaths in the last 24 hours
Active cases: 3,70,640
Total recoveries: 3,19,59,680
Death toll: 4,38,560Vaccination: 64,05,28,644 pic.twitter.com/dVyKCg4cep
— ANI (@ANI) August 31, 2021
गेल्या २४ तासात भारतात ३० हजार ९४१ नवे कोरोनाबाधित आढळले. तसेच ३५० रुग्णांचा मृत्यू झाला. कालच्या दिवसात देशात ३६ हजार २७५ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३ कोटी २७ लाख २२ हजार १२१ इतका आहे. देशात आतापर्यंत ३ कोटी १९ लाख ५९ हजार ६८० रुग्ण बरे झाले आहेत. तर ४ लाख ३८ हजार ५६० रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. ३ लाख ७० हजार ६४० इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.