सरसंघचालक मोहन भागवत (Sarsanghchalak Mohan Bhagwat) यांनी संघाच्या विजयादशमी (Vijayadashmi) महोत्सवात केलेल्या भाषणावर एमआयएमचे (MIM) खासदार असदुद्दीन ओवेसी (MP Asaduddin Owaisi) यांनी जोरदार टीका केली आहे. सीएएवरून काही लोक मुस्लिमांच्या (Muslims) भावना भडकविण्याचे काम करत आहेत.
नवी दिल्ली : सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या विजयादशमी महोत्सवात केलेल्या भाषणावर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेस यांनी जोरदार टीका केली आहे. सीएएवरून काही लोक मुस्लिमांच्या भावना भडकविण्याचे काम करत आहेत. या कायद्याचा आणि धर्माचा काहीही संबंध नाही, त्यामुळे सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे असे भागवत यांनी सांगितलं होतं. त्यावरून ओवेसींनी भागवतांवर निशाणा साधला आहे.
ओवेसी म्हणाले, सरसंघचालक हे दिशाभूल करत आहेत, हे न ओळखण्याएवढे आम्ही लहान नाही. नागरिकत्वासाठी आम्हाला आमचे भारतीयत्व सिद्ध करायला लावणाऱ्या कुठल्याही कायद्याला आमचा विरोध राहणार आहे. या विषयावर काँग्रेस आणि इतर पक्षांनी बोटचेपी भूमिका घेतली अशी टीकाही त्यांनी केली.