सुनावणी दरम्यान ही हीन वागणूक दिल्याप्रकरणी बलात्कार पीडितेने केली सरन्यायाधीशांकडे तक्रार

बलात्काराच्या घटनेनंतर माझा मानसिक त्रास झाला आणि या सगळ्या परिस्थितीमध्येसुध्दा मी पोलिसांकडे गेले व तक्रार दाखल केली, का तर आरोपीला जबाबदार धरले जावे. त्यासाठी मी या तक्रारीचा पाठपुरावा देखील केला होता. तथापि, या प्रकरणातील अटकपूर्व जामिनावरील सुनावणी दरम्यान अतिरिक्त सत्र न्यायाधीशांच्या असंवेदनशील, अनुचित आणि क्लेशकारक वागण्यामुळे, माझे दु: ख आणि मानसिक आघात आणखी तीव्र झाले आहेत.

    ईटी नाऊचा अँकर वरुण हिरेमठवर बलात्काराचा आरोप करणार्‍या २२ वर्षीय महिलेने आता मुख्य न्यायाधीश एस. ए. बोबडे यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये महिलेने या प्रकरणातील अटकपूर्व जामिनावरील सुनावणी दरम्यान अतिरिक्त सत्र न्यायाधीशांच्या असंवेदनशील, अनुचित आणि क्लेशकारक वागण्याकडे त्यांचे लक्ष वेधले आहे.

    तक्रारकर्त्या महिलेने फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीसखटला दाखल केला हिरेमठवर या बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि आपल्याला कैद करून ठेवल्याचा आरोप केला आहे. यावर्षी फेब्रुवारीच्या उत्तरार्धात हा खटला दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून हिरेमठ फरार आहे.

    ११ मार्च २०२१ रोजीच्या एका पत्रात महिलेने १० मार्च २०२१ रोजी पटियाला हाऊस कोर्टात अटकपूर्व जामीन सुनावणीचा संदर्भ दिला आहे. सुनावणीदरम्यान, तिने सांगितले की आरोपीच्या वकिलाने वारंवार तिच्याशी अभद्र व्यवहार केला तसेच बऱ्याच गोष्टींवर विनोद केले. मात्र या अनादर करणाऱ्या व संवेदनशील वागण्यावर आक्षेप घेण्याऐवजी न्यायाधीश संजय खानगवाल हसत होते.

    “सुनावणीच्या वेळी, आरोपीचे प्रतिनिधीत्व करणारे वकील अग्रवाल यांनी वारंवार माझ्याविरूद्ध खोटी, अपमानास्पद अशी गंभीर टीका केली आणि मला हीन वागणूक दिली. अग्रवाल यांना फटकारण्याऐवजी आणि त्यांना असे करण्यापासून रोखण्याऐवजी न्यायाधीश संजय खानगवाल मझ्यावर अनेकवेळा हसले. ”

    आरोपीच्या वकीलांची वागणूक “भयानक क्लेशकारक” होती परंतु न्यायाधीशांची वागणुकसुद्धा तशीच आहे यावरून ती अधिक जास्त धक्का बसला. मुख्य न्यायाधीश बोबडे यांना लिहितात, ” अग्रवाल यांच्या वक्तव्यांनी माझ्या चारित्र्याचे हनन झाले आहे. तर न्यायाधीशांनी त्यांच्या घाणेरड्या युक्तिवादांवरून हसून माझे दु: ख आणखीनच वाढवले आहे.”

    “बलात्काराच्या घटनेनंतर माझा मानसिक त्रास झाला आणि या सगळ्या परिस्थितीमध्येसुध्दा मी पोलिसांकडे गेले व तक्रार दाखल केली, का तर आरोपीला जबाबदार धरले जावे. त्यासाठी मी या तक्रारीचा पाठपुरावा देखील केला होता. तथापि, या प्रकरणातील अटकपूर्व जामिनावरील सुनावणी दरम्यान अतिरिक्त सत्र न्यायाधीशांच्या असंवेदनशील, अनुचित आणि क्लेशकारक वागण्यामुळे, माझे दु: ख आणि मानसिक आघात आणखी तीव्र झाले आहेत. काल झालेल्या घटनांमुळे फौजदारी न्याय प्रणालीच्या कामकाजावरील माझा विश्वास पूर्णपणे डळमळला आहे. सर, मला न्याय मिळाल्याच्या निरर्थक आशेने माझ्या तक्रारीचा पाठपुरावा केल्याबद्दल मला वाईट वाटते. ”  इतर कोणत्याही पीडिताला तसा अपमान सहन करावा लागणार नाही, याची काळजी घ्यावी म्हणून आपण योग्य ती पावले उचलावीत या आशेने मी आपल्याला हे पत्र लिहीत आहे.