देशात वाघांच्या मृत्यूच्या प्रमाणात १५३ टक्‍क्‍यांनी वाढ, वनविभागा समोर मोठं आव्हान

संपूर्ण देशात मागील दीड वर्षांपासून करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. करोनाच्या दुसऱ्या टप्प्यात जिथे मानवी मृत्युदर वाढला तिथे वाघांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले. या दोन्ही मृत्यूचा एकमेकांशी थेट संबंध नाही. मात्र, दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात करोनाचा अधिक प्रभाव जाणवत असताना वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनाही त्याची झळ बसली. त्याचा परिणाम व्याघ्र संरक्षणावर झाला.

    देशात वाघांच्या संरक्षणासाठी विविध योजना, प्रकल्प राबवले जातात. एवढंच नाही तर अगदी विशेष राखीव वनसुद्धा ठेवण्यात आलेली आहेत. मात्र तरीदेखील वाघांच्या मृत्यूचे आकडेवारी काही कमी झालेली नाही. गेल्या वर्षाच्या तुलनेत देशात वाघांच्या मृत्यूच्या प्रमाणात १५३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

    भारतात सलग दोन वर्षापासून वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंतेचा विषय ठरत आहे. गेल्या सहा महिन्यात देशभरात ८६ वाघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून यात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.

    ‘क्ला’- कन्झर्वेशन लेन्सेस अँड वाईल्डलाइफ ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून वन्यजीव क्षेत्रात काम करत आहे. या संस्थेकडून वाघांच्या मृत्यूसंदर्भात माहिती संकलित केली जाते.

    संपूर्ण देशात मागील दीड वर्षांपासून करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. करोनाच्या दुसऱ्या टप्प्यात जिथे मानवी मृत्यूदर वाढला तिथे वाघांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले. या दोन्ही मृत्यूचा एकमेकांशी थेट संबंध नाही. मात्र, दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात करोनाचा अधिक प्रभाव जाणवत असताना वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनाही त्याची झळ बसली. त्याचा परिणाम व्याघ्र संरक्षणावर झाला.

    कुठल्या राज्यात किती मृत्यू

    राज्य

    वाघांच्या मृत्यूची संख्या

    मध्यप्रदेश २६
    महाराष्ट्र २२
    कर्नाटक ११
    उत्तर प्रदेश ०८
    उत्तराखंड ०६
    आसाम ०४
    केरळ ०३
    राजस्थान ०२
    बिहार ०२
    तमिळनाडू ०१
    प. बंगाल ०१

    प्राधिकरणाच्या अहवालानुसार, पाच किंवा त्याहून अधिक वाघांच्या अवयवांच्या जप्तीची प्रकरणे आहेत. २०२० या वर्षांत वाघांचे ९८ मृत्यू नोंदवण्यात आले. त्यापैकी ५६ मृत्यू जून २०२० पर्यंत म्हणजेच पहिल्या सहा महिन्यांतील होते. २०१९ या संपूर्ण वर्षांत वाघांच्या मृत्यूची ८४ प्रकरणे नोंदवण्यात आली. सलग तीन वर्षांच्या आकडेवारीवरून वाघांचा मृत्यूदर वाढत चालल्याचे स्पष्ट होत आहे. या वर्षी पहिल्या तीन महिन्यांतच संपूर्ण भारतात ३९, तर सहा महिन्यांत ८६ वाघ मृत्यूमुखी पडले.