एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.(corona patients in India)देशात गेल्या २४ तासांत २ लाख ५१ हजार ८२७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.
भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची(corona patients in India) संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.देशात गेल्या २४ तासांत २ लाख ५१ हजार ८२७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. भारतात गेल्या २४ तासांत ३ लाख २३ हजार १४४ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान २७७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्येत ४७.६७ टक्के रुग्ण हे पाच राज्यांमधील असून त्यात महाराष्ट्रातील रुग्ण १५.७ टक्के आहेत.
दरम्यान देशातील एकूण रुग्णसंख्या १ कोटी ७६ लाख ३६ हजार ३०७ इतकी झाली आहे. तर २७७१ मृत्यूंसोबत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १ लाख ९७ हजार ८९४ वर पोहोचली आहे. दरम्यान देशात गेल्या २४ तासांत २ लाख ५१ हजार ८२७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आत्तापर्यंत १ कोटी ४५ लाख ५६ हजार २०९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशात सध्याच्या घडीला २८ लाख ८२ हजार २०४ सक्रिय रुग्ण आहेत. तसेच १४ कोटी ५२ लाख ७१ हजार १८६ जणांचं लसीकरण झालं आहे.
India reports 3,23,144 new #COVID19 cases, 2771 deaths and 2,51,827 discharges in the last 24 hours, as per Union Health Ministry
Total cases: 1,76,36,307
Total recoveries: 1,45,56,209
Death toll: 1,97,894
Active cases: 28,82,204Total vaccination: 14,52,71,186 pic.twitter.com/ynq5OSrzCT
— ANI (@ANI) April 27, 2021
महाराष्ट्राबद्दल बोलायचे तर राज्यात सोमवारी ७१ हजार ७३६ रूग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आजपर्यंत एकूण ३६,०१,७९६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८२.९२ एवढे झाले आहे. सोमवारी राज्यात ४८ हजार ७०० नवीन रुग्णांचे निदान झाले आहेत.