‘मोदी रोजगार दो’ (#modi_rojgar_do)हा हॅशटॅग रविवारपासून सोशल नेटवर्किंगवर ट्रेंड होताना दिसत आहे. या हॅशटॅगवर सहा लाख ७४ हजारांपेक्षा जास्त जणांनी ट्विट केलं आहे.
देशामधील बेरोजगारी(unemployment in India) दिवसोंदिवस वाढत आहे. याच समस्येला कंटाळलेल्या अनेकांनी आता थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडेच नोकरी द्या अशी मागणी केली आहे. ‘मोदी रोजगार दो’ (#modi_rojgar_do)हा हॅशटॅग रविवारपासून सोशल नेटवर्किंगवर ट्रेंड होताना दिसत आहे. या हॅशटॅगवर सहा लाख ७४ हजारांपेक्षा जास्त जणांनी ट्विट केलं आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही ट्विटरवरुन हा हॅशटॅग वपारुन केंद्र सरकारला, ‘सुनो जन के मन की बात’ असा सल्ला दिलाय.
सुनो जन के मन की बात-#modi_rojgar_do
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 21, 2021
कोरोनाच्या कालावधीमध्ये देशात बेरोजगारांची संख्या झापट्याने वाढली. आयएलओच्या आखडेवारीनुसार जागतिक स्तरावर बेरोजगारी ५७ टक्क्यांपर्यंत आहेत. तर भारतामध्ये बेरोजगारी ही ४७ टक्क्यांपर्यंत आहे. भारताचे शेजारी देश असणाऱ्या पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये बेरोजगारीचा प्रश्न अधिक गंभीर आहे. पाकिस्तानमध्ये ५० टक्के तर श्रीलंकेमध्ये ५१ टक्के बेरोजगारी असून बांगलादेशमध्ये बेरोजगारीचे प्रमाण ५७ टक्क्यांपर्यंत आहे.
सीएमआयईईच्या अहवालानुसार २०२० मध्ये एक कोटी ७७ लाख पगारदार व्यक्तींनी आपला रोजगार गमावला. खास करुन मार्चमध्ये लॉकडाउन लागू झाल्यानंतर जून आणि जुलैपर्यंत अनेकांनी आपला रोजगार गमावला. त्यामुळेच आता अर्थव्यवस्था हळूहळू सुरळीत होत असतानाच सरकारने दिलेलं आश्वासन पाळत बेरोजगारांना नोकरी द्यावी अशी मागणी ट्विटवरुन केली जात आहे.
#modi_rojgar_दो
Reply our government on students demands pic.twitter.com/aCBKNVNXP2— Sachin (@Sachin68688665) February 22, 2021
#modi_rojgar_दो
Reply our government on students demands pic.twitter.com/aCBKNVNXP2— Sachin (@Sachin68688665) February 22, 2021