sindhu border

दिल्ली-हरियाणा सिंधू सीमेवर(delhi-hariyana -sindhu border) बसलेल्या आंदोलनकर्त्यांचे(farmers protest on border) अवसान आता गळू लागले आहे. त्यांच्या चेहऱ्यावर निराशा झळकत आहे. सरकारने त्यांना चर्चेसाठी बोलवावे अशी त्यांची इच्छा आहे. परंतु ते असे स्पष्ट सांगत नसले तरी त्यांच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसत आहे.

    दिल्ली/सोनीपत/ गाजियाबाद: येत्या २६ तारखेला दिल्ली-एनसीआर सीमेवर शेतकरी करीत असलेल्या(farmers protest) आंदोलनाला ४ महिने पूर्ण होतील. शेतकऱ्यांनी या दिवशी म्हणजे २६ मार्चला सकाळी ६ पासून संध्याकाळी ६ पर्यंत भारत बंदचे आवाहन केले आहे. यादरम्यान दिल्ली-हरियाणा सिंधू सीमेवर बसलेल्या आंदोलनकर्त्यांचे अवसान आता गळू लागले आहे. त्यांच्या चेहऱ्यावर निराशा झळकत आहे. सरकारने त्यांना चर्चेसाठी बोलवावे अशी त्यांची इच्छा आहे. परंतु ते असे स्पष्ट सांगत नसले तरी त्यांच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसत आहे. ते कोणत्याही बहाण्याने घरी परतू इच्छित आहे. परंतु नेता अजूनही त्यांना थोपविण्याचा प्रयत्न करीत आहे. येत्या काही दिवसात होळीचा सण आहे व त्यानंतर गव्हाची कापणीदेखील सुरू होणार आहे.

    आंदोलनकर्त्यांना थोपविण्याचा प्रयत्न
    दरम्यान, शिखांचे पवित्र धर्मस्थान आनंदपूर साहिबमध्ये होळीच्या नंतर तीन दिवस होला मोहल्ला मेळा सुरू होईल. त्यासाठी आंदोलनकर्त सिंधू सीमेवर फेब्रुवारीमध्ये पाहण्यात आलेली शांतता पुन्हा दिसू लागली आहे. आंदोलनस्थळे रिकामी दिसत आहेत. आंदोलनकर्ते कमकुवत झाल्याचे पाहून नेत्यांमध्ये खळबळ माजली आहे. ते आंदोलनकर्त्यांना थोपविण्याचा प्रयत्न करीत आहे. आंदोलनकर्त्यांना येथूनच होला मोहल्ला मेळ्यात न जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

    गाजीपूर सीमेवर होळी
    दिल्ली-उत्तर प्रदेशमधील गाजीपूर सीमेवर गेल्या तीन महिन्यांपासून शेतकरी कृषी कायद्याचा विरोध करीत आहेत. याचदरम्यान याच सीमेवर शेतकऱ्यांकडून होळी उत्सव साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांनी सांगितले की, सुमारे ७०० वर्षांपासून या भागात अशा पद्धतीने होळी साजरी करण्याचे कार्य होत आहे. ही होळी साजरा करण्याची अनोखी पद्धत आहे. यादरम्यान ढोलताशांवर नृत्य करून होळी साजरी करतात. बुलंदशहर येथील अशोक सिरोही यांनी सांगितले की, होलिका दहन होताच कीटक-पतंगे व कीड्यांचेही दहन होते, अशी मान्यता आहे. मात्र शेतकरी आंदोलन करत सरकारच्या कृषी कायद्यांना विरोधी व्हायरस संपविण्यासाठी येथे आले आहेत व कृषी कायद्याविरोधात व्हायरस संपविणार आहेत.