नवा कृषी कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचाच, फिक्कीच्या बैठकीच्या उद्घाटनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाष्य

 नव्या कृषी कायद्यांविरोधात(new agricultural laws) गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. हे कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. या दरम्यान, कृषी क्षेत्राच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व भिंती आपण पाडत आहोत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी(prime minister narendra modi) यांनी म्हटलं आहे.

नव्या कृषी कायद्यांविरोधात(new agricultural law) गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. हे कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. या दरम्यान, कृषी क्षेत्राच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व भिंती आपण पाडत आहोत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी(prime minister narendra modi) यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते FICCI च्या ९३ व्या वार्षिक बैठकीचं ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं. यावेळी त्यांनी कृषी कायद्यांसह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना फायदाच होणार असल्याचे सांगितले आहे. कृषी क्षेत्राच्या आड येणाऱ्या सर्व भिंती आपण पाडत आहोत. नव्या कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना नवे बाजार उपलब्ध होतील. त्यांचे उत्पन्नही वाढेल. कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे शेतकऱ्यांना फायदाही होईल आणि नवनवे पर्यायही उपलब्ध होतील, असे पंतप्रधान म्हणाले.

“शेतीमध्ये जेवढी खासगी क्षेत्राकडून गुंतवणूक झाली पाहिजे होती ती करण्यात आली नाही. खासगी क्षेत्रानं कृषी क्षेत्रावर हवं तसं काम केलं नाही. कृषी क्षेत्रात ज्या खासगी कंपन्या चांगलं काम करत आहेत त्यांना अधिक चांगलं काम करण्याची आवश्यकता आहे,” असंही मोदींनी स्पष्ट केलं आहे.

भारतातील बाजारांचं आधुनिकीकरण होत आहे. देशात सर्वत्र सुधारणा करण्यात आल्या आहेत. आज भारतात कॉर्पोरेट टॅक्स हा जगात असलेल्या टॅक्सपेक्षा सर्वात कमी आहे. देश आज प्रगतीपथावर आहे. जेव्हा एक क्षेत्र विकसित होतं तेव्हा त्याचा इतर क्षेत्रांवरही सकारात्मक परिणाम होत असल्याचं मोदी म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, गेल्या सहा वर्षांमध्ये जगाचा भारतावरील विश्वास वाढला आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये तर हा विश्वास अधिक दृढ झाला आहे. एफडीआय असेस किंवा एफपीआय परदेशी गुंतवणुकदारांनी भारतात विक्रमी गुंतवणूक केली आहे आणि आता गुंतवणूक सुरूच आहे.

२०२० या वर्षात आपल्या देशानं आणि संपूर्ण जगानं जे चढउतार पाहिले ते काही वर्षांनी आपण आठवलं तरी आपल्याला विश्वास ठेवणं कठिण होईल. ज्या गतीनं परिस्थिती बिघडली त्याच गतीनं ती सुधारतही आहे. महासाथीदरम्यान भारतानं आपल्या नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य दिलं. अनेकांचे जीव आपण वाचवले. आज त्याचा परिणाम संपूर्ण देश आणि जग पाहत आहे, असे मोदी म्हणाले.