भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर शौर्य क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीची चाचणी यशस्वी

पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन ( India-China ) संघर्ष सुरू आहे. या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर भारताने (India) आज शनिवारी शौर्य क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीची (India successfully test-fires new version of nuclear-capable Shaurya Missile)  यशस्वी चाचणी केली आहे. ही चाचणी ओडिशाच्या (Odisha) बालासोर येथे घेण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन ( India-China ) संघर्ष सुरू आहे. या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर भारताने (India) आज शनिवारी शौर्य क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीची (India successfully test-fires new version of nuclear-capable Shaurya Missile)  यशस्वी चाचणी केली आहे. ही चाचणी ओडिशाच्या (Odisha) बालासोर येथे घेण्यात आली. तसेच शौर्य क्षेपणास्त्राच्या या नव्या आवृत्तीच्या माध्यमातून ८०० किमी दूरवर निशाणा लावला जाऊ शकतो.

जमिनीवरुन जमिनीवर मारा करण्याची आणि अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेलं हे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्रामुळे भारताची सध्याची क्षेपणास्त्र व्यवस्था अधिक बळकट होईल. हे क्षेपणास्त्र संचलित करण्यास हलकं आणि सोपं आहे, असं लष्कराच्या सुत्रांनी म्हटलं आहे.

यापूर्वी बुधवारी भारताने ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. हे क्षेपणास्त्र ४०० किमी पर्यंतच्या अंतरावरील टार्गेट उध्वस्त करु शकतं.