चीनमुळे जगभरात टेन्शन! चीनसह ‘या’ 5 देशांतून आल्यावर करावी लागेल RT-PCR टेस्ट, पॉझिटिव्ह आढळल्यास क्वारंटाईनही व्हाव लागणार

कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने तीन दिवसांत तीन उच्चस्तरीय बैठका घेतल्या. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची बैठक घेतली. त्यांनी T3 ची रणनीती म्हणजे टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट अवलंब करण्याचे निर्देश संबधित यंत्रणेला दिले.

    चीनने जगभरातील देशांच टेन्शन वाढवलं आहे. भारतातही कोरोनाचा धोका पाहता केंद्र सरकार सतर्क झालं आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, आता चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंडमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर चाचणी आवश्यक करण्यात आली आहे. अशी माहिती  केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांनी दिली. या प्रवाशामध्ये कोविड-19 ची लक्षणे आढळल्यास किंवा चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास या लोकांना क्वारंटाईन करण्यात येईल.

    गेल्या 24 तासात देशात 201 नव्या रुग्णांची नोंद

    गेल्या 24 तासांत देशात 201 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. सध्या भारतात 3,397 सक्रिय रुग्ण आहेत, जी एकूण रुग्णसंख्यापैकी 0.01% आहे. तर कोरोन रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.8% आहे. गेल्या 24 तासांत 183 लोक बरे झाले असून एकूण बरे झालेल्यांची संख्या 4,41,42,791 झाली आहे.

     

    75% लोकांना बूस्टर डोस मिळाला नाही – आरोग्य मंत्रालय

     
    दुसरीकडे, लसीबाबत आरोग्य मंत्रालयाचा एक धक्कादायक अहवाल आला आहे. देशातील 75% लोकांना बूस्टर डोस मिळालेला नाही अशी माहिती त्या अहवालातून समोर आली आहे. आतापर्यंत, कोणत्याही राज्यात 50% बूस्टर डोस मिळालेलं नाही. तेलंगणा, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि ओडिशामध्ये 40% पेक्षा जास्त लोकांना बूस्टर डोस मिळाला आहे.

    केंद्र सरकार T3 ची रणनीती – टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट-

    कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने तीन दिवसांत तीन उच्चस्तरीय बैठका घेतल्या. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची बैठक घेतली. त्यांनी T3 ची रणनीती म्हणजे टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट अवलंब करण्याचे निर्देश संबधित यंत्रणेला दिले. सध्या चीनमध्ये कोरोनाच्या BF.7 उपप्रकारामुळे दररोज ५ हजार मृत्यू होत आहेत. हा प्रकार सप्टेंबरमध्ये भारतात आला होता. देशात त्याची फक्त 4 प्रकरणे आहेत. त्यापैकी 3 प्रकरणे गुजरातमध्ये आहेत आणि 1 प्रकरण ओडिशातील आहे. हे रुग्ण आता कोणत्याही लक्षणांशिवाय निरोगी आहेत.