
बिहारमध्ये लष्करात भरती होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून रेल्वे स्थानकावर आंदोलन (Movement At The Railway Station) करण्यात आलं असून या ठिकाणी दगडफेकही (Stone Pelting) करण्यात आली. सलग दुसऱ्या दिवशी बिहारमध्ये आंदोलन सुरू आहे.
Bihar Protest against Agneepath Scheme: केंद्र सरकारने (Central Government) लष्कर (Army), नौदल (Navy) आणि वायुदलातील (Air Force) सैनिक भरतीसाठी (Soldiers Recruitment) ‘अग्निपथ’ योजना (Agneepath Scheme) जाहीर केल्यानंतर बिहार आणि राजस्थानमध्ये या योजनेला विरोध होऊ लागला आहे.
बिहारमध्ये लष्करात भरती होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून रेल्वे स्थानकावर आंदोलन (Movement At The Railway Station) करण्यात आलं असून या ठिकाणी दगडफेकही (Stone Pelting) करण्यात आली. सलग दुसऱ्या दिवशी बिहारमध्ये आंदोलन सुरू असून अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल्वे वाहतुकीलाही आडकाठी करण्यात आल्याने तिचाही बोऱ्या वाजला असल्याचं चित्र आहे.
संतप्त विद्यार्थ्यांनी भभुआ रेल्वे स्थानकावर इंटरसिटी एक्र्स्प्रेस (Intercity Express At Bhabhua Railway Station) ट्रेनवर दगडफेक केली असून एक डबा आंदोलकांनी पेटवून दिला, योजनेला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हातात भारतीय लष्कराचे चाहते असा बॅनर घेतलेला दिसत होता. फक्त २५ टक्के युवकांना सेवेत घेतलं जाणार आहे. चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर पुढे काय? असा प्रश्न या आंदोलकांद्वारे उपस्थित करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांकडून दगडफेक होत असल्याने आंदोलक विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला. यासोबत विद्यार्थ्यांनी लावलेली आग विझवण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे.
#WATCH | Bihar: Youth demonstrate in Chhapra, burn tyres and vandalise a bus in protest against the recently announced #AgnipathRecruitmentScheme pic.twitter.com/Ik0pYK26KY
— ANI (@ANI) June 16, 2022
अजमेर-दिल्ली हायवे रोखला,बक्सर रेल्वे स्थानकावर केलं आंदोलन
जयपूरमध्ये १५० लोकांनी अजमेर-दिल्ली हायवे रोखला. पोलिसांनी १० आंदोलकांना अटक केली आहे. दुसरीकडे बक्सर जिल्ह्यात १०० हून अधिक तरुण रेल्वे स्थानकावर पोहोचले होते. ट्रॅकवर उतरत तरुणांनी जनशताब्दी एक्स्प्रेस ३० मिनिटांसाठी रोखली होती.
#WATCH | Bihar: Armed forces aspirants protest in Munger against #AgnipathRecruitmentScheme
A protester says "We demand that the recruitment be done as it used to be done earlier,Tour of Duty (ToD) be rolled back & exams be held as earlier. Nobody will go to Army just for 4 yrs" pic.twitter.com/b5dnSUYohW
— ANI (@ANI) June 16, 2022
देशाच्या तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांसह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन अग्निपथ योजनेची घोषणा केली होती. ‘‘अग्निपथ भरती योजना हे एक क्रांतिकारी पाऊल आहे. त्यामुळे संरक्षण दलांना आणखी तरुण चेहरा प्राप्त होईल. या योजनेंतर्गत युवकांना संरक्षण दलांत चार वर्षे ‘अग्निवीर’ म्हणून सेवेची संधी मिळेल’’, असं सिंह यांनी सांगितलं होतं. या योजनेद्वारे भरतीमुळे व्यापक स्तरावर प्रतिभावान सैनिक संरक्षणदलांना मिळतील, असा विश्वास नौदलप्रमुख अॅडमिरल आर. हरिकुमार यांनी व्यक्त केला होता.
असा असेल मोबदला
यंदा ४६,००० जणांची ‘अग्निवीर’ म्हणून भरती केली जाईल. ही भरती तीन महिन्यांतच सुरू होईल. त्यासाठी साडेसतरा ते २१ ही वयोमर्यादा असेल. पहिल्या वर्षी ‘अग्निवीरां’ना मासिक ३० हजार रुपये मोबदला मिळेल. त्यांना दुसऱ्या वर्षी ३३,०००, तिसऱ्या वर्षी ३६,५०० आणि चौथ्या वर्षी ४०,००० मोबदला मिळणार आहे. प्रत्येक ‘अग्निवीरा’ला ११.७१ लाख सेवानिधी मिळणार असून, हे उत्पन्न करमुक्त असेल, शिवाय, त्यांना सेवाकाळात ४८ लाखांचे विमाकवचही मिळणार आहे.