बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; किनारपट्टी भागात पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरात हवेच्या तीव्र कमी दाब क्षेत्राला त्याच्या निर्मितीपासून पुढे ताशी ७६ किमी वेगाने सरकताना प्रवासासाठी उपलब्ध समुद्रपाणी पृष्ठभाग क्षेत्र अंतर कमी मिळत आहे. सदर चक्रीवादळ सध्या त्याच्या ईशान्य मान्सूनच्या नेहमीसारख्या घडणाऱ्या नैसर्गिक प्रक्रियेसारखे पूर्व-पश्चिम साधारण १५ डिग्री अक्षवृत्तादरम्यान आग्नेयेकडून वायव्येकडे जात आहे. त्यामुळे त्याचा महाराष्ट्रावर विशेष असा नुकसान होण्याच्या दृष्टीने काही परिणाम जाणवणार नसल्याची शक्यता माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.

    नवी दिल्ली – बंगालच्या उपसागरात (Bengal Sea) अंदमानच्या दक्षिणेला हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे आज चक्रीवादळ (Cyclone) तयार होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ तामिळनाडूची (Tamilnadu) किनारपट्टी आणि पदुच्चेरीच्या उत्तरेकडे सरकण्याचा अंदाज आहे. त्यामुळे गुरुवारी आंध्र प्रदेशची किनारपट्टी, तामिळनाडू, पदुच्चेरी, कराईकल या भागात ७ ते १० डिसेंबरदरम्यान जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिली आहे. हे चक्रीवादळ मुंबईसह (Mumbai) कोकणमधून जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    बंगालच्या उपसागरात हवेच्या तीव्र कमी दाब क्षेत्राला त्याच्या निर्मितीपासून पुढे ताशी ७६ किमी वेगाने सरकताना प्रवासासाठी उपलब्ध समुद्रपाणी पृष्ठभाग क्षेत्र अंतर कमी मिळत आहे. सदर चक्रीवादळ सध्या त्याच्या ईशान्य मान्सूनच्या नेहमीसारख्या घडणाऱ्या नैसर्गिक प्रक्रियेसारखे पूर्व-पश्चिम साधारण १५ डिग्री अक्षवृत्तादरम्यान आग्नेयेकडून वायव्येकडे जात आहे. त्यामुळे त्याचा महाराष्ट्रावर विशेष असा नुकसान होण्याच्या दृष्टीने काही परिणाम जाणवणार नसल्याची शक्यता माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. चक्रीवादळ वाऱ्याच्या घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरणाऱ्या स्थितीमुळे त्याच्या अतिबाहेरील परिघ-घेरातून महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येणाऱ्या आर्द्रतेच्या वक्रकार पट्ट्यातील १४ जिल्ह्यात आठवडाभर म्हणजे ९ ते १६ डिसेंबरदरम्यान ढगाळ वातावरण होण्याची शक्यता आहे. वातावरणासहित उर्ध्व दिशेने संवहनी प्रक्रियेतून तुरळक ठिकाणी अवकाळी बे-मोसमी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.

    चक्रीवादळाच्या स्थितीमुळे महाराष्ट्रात वातावरण राहणार आहे. याचा परिणाम थंडीवर होणार असून राज्यात सध्या असणारा थंडीचा जोर कमी होणार आहे. थंडीला कदाचित आठवडाभरच अटकाव होण्याची शक्यता माणिकराव खुळे यांनी वर्तवली. उत्तर भारतात एकामागोमाग येणाऱ्या पश्चिमी झंजावाताची मालिका सुरूच आहे. तेथील पाऊस, बर्फ, थंडी आणि सकाळच्या वेळी धुके पडणे सुरूच असणार आहे. आजपासून पुढील तीन दिवस महाराष्ट्रात सरासरीपेक्षा किमान तापमानात चार, तर कमाल तापमानात दोन अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता असल्याचे खुळे यांन सांगितले.