Foreign Minister S Jaishankar

जयशंकर पुढे म्हणाले की, ‘श्रीकृष्णाने आपल्याला धैर्य कसे राखायचे ते शिकवले. श्रीकृष्णाने शिशुपालाचे १०० अपराध क्षमा केले; परंतु त्यानंतर त्याचा वध केला. कौरव आणि पांडव यांमध्ये महाभारताचे युद्ध झाले होते. लोक असे म्हणतात की, इतिहास आणि धार्मिक ग्रंथ यांमधून आपल्याला नवा दृष्टीकोन मिळतो.

    पुणे – भगवान श्रीकृष्ण आणि हनुमान हे जगातील सर्वांत महान मुत्सद्दी आहेत. धोरणात्मक संयमाचे मोठे उदाहरण म्हणजे श्रीकृष्ण ! श्री हनुमान तर मुत्सद्देगिरीच्याही पलीकडे गेले होते. ते लंकेला गेले, तिथे त्यांनी सीतेशी संपर्क साधला, लंकेला आगही लावली, असे मत भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी व्यक्त केले. जयशंकर यांनी लिहिलेले ‘द इंडिया वे : स्ट्रॅटेजीज फॉर अ‍ॅन अनसर्टन वर्ल्ड’च्या मराठी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन २८ जानेवारी या दिवशी करण्यात आले. ‘भारत मार्ग’ असे या भाषांतर केलेल्या मराठी पुस्तकाचे नाव आहे. त्या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जयशंकर यांनी मुत्सद्दीपणाची व्याख्या सांगतांना महाभारत आणि रामायण यांचे महत्त्व सांगितले.

    श्रीकृष्णाने आपल्याला धैर्य कसे राखायचे ते शिकवले
    जयशंकर पुढे म्हणाले की, ‘श्रीकृष्णाने आपल्याला धैर्य कसे राखायचे ते शिकवले. श्रीकृष्णाने शिशुपालाचे १०० अपराध क्षमा केले; परंतु त्यानंतर त्याचा वध केला. कौरव आणि पांडव यांमध्ये महाभारताचे युद्ध झाले होते. लोक असे म्हणतात की, इतिहास आणि धार्मिक ग्रंथ यांमधून आपल्याला नवा दृष्टीकोन मिळतो. मुत्सद्देगिरीच्या दृष्टीकोनातून आपण श्रीकृष्णाकडे आणि हनुमानाकडे पाहिले, तर त्यांच्या महानतेची प्रचीती येते. ‘हनुमानाला कोणते कार्य दिले होते ?’, ‘ते कार्य हनुमानाने कसे पूर्ण केले ?’, स्वत:च्या बुद्धीमत्तेचा परिचय देत ते एवढ्या पुढे गेले की, त्यांनी कार्य तर पूर्ण केलेच; परंतु त्यापुढे जाऊन त्यांनी लंकाही भस्मसात केली.

    पाकिस्तानला आता मित्र राहिलेला नाही
    एस. जयशंकर त्यांच्या इंग्रजी पुस्तक “द इंडिया वे: स्ट्रॅटेजीज फॉर एन अनसर्टेन वर्ल्ड” च्या प्रकाशनासाठी पुण्यात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. त्याचप्रमाणे त्यांनी भारताच्या बहुध्रुवीय स्वरूपाची तुलना कुरुक्षेत्राशी केली. “रणनीतिक फसवणूक” बद्दल बोलताना, जयशंकर यांनी भगवान कृष्णाने सूर्यास्ताचा भ्रम निर्माण केल्याचे उदाहरण दिले. शेजारी निवडण्यासाठी भारताच्या भौगोलिक मर्यादांबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. म्हणाले हे आमच्यासाठी वास्तव आहे…. पांडव नातेवाईक निवडू शकले नाहीत, शेजारी निवडू शकले नाहीत. दहशतवादाचा मुकाबला करण्यात असमर्थता दर्शविल्याबद्दल जागतिक स्तरातून पाकिस्तानवर टीका होत आहे. संकटाच्या वेळी इतर देशांना मदत करण्यासाठी त्याचे मार्ग सुधारणे आवश्यक आहे. पाकिस्तानकडे आता फारच कमी मित्र देश आहेत ज्यापैकी तुर्की पाकिस्तानला मदत करण्याच्या स्थितीत नाही. चीन कधीही अनुदान देत नाही, फक्त कर्ज देतो. कर्ण आणि दुर्योधनाच्या मैत्रीचा त्याला किंवा त्याच्या कुटुंबाला फायदा झाला नाही. त्याचा समाजावर सकारात्मक परिणाम झाला नाही. या मैत्रीने त्यांचे जीवन गिळंकृत केले आणि त्यांच्या नातेवाइकांना प्रचंड विनाश, अपरिवर्तनीय नुकसान आणि भयंकर दुःख दिले. जगातील अनेक देशांची अशी मैत्री बघायला मिळेल.

    मोंदीचे मानले आभार
    जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परराष्ट्र मंत्री बनवल्याबद्दल त्यांचे आभार मानले. जयशंकर म्हणाले की परराष्ट्र सचिव बनणे ही माझ्या महत्त्वाकांक्षेची मर्यादा आहे, मी मंत्री होण्याचे स्वप्नातही पाहिले नव्हते. पंतप्रधान मोदींचे आभार मानताना ते म्हणाले की, नरेंद्र मोदींशिवाय इतर कोणत्याही पंतप्रधानाने मला मंत्री केले नसते.