कोरोनोशी दोन हात करण्यासाठी सर्वांचे सहकार्य हवे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आवाहन

पुन्हा लाॅकडाउन नको असेल तर सर्वांनी कोरोनाचे नियम पाळून कोरोनोशी दोन हात करायचे आहे. ही लढाई पून्हा जिंकायची आहे, त्यासाठी सर्व जिल्हावासीयांनी साथ द्यावी. असे भावनात्मक आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज केले.

    जळगाव : कोरोना प्रादुर्भाव होवू नये यासाठी तयार केलेल्या नियमांचे नागरीक पालन करीत नसल्याने जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात मे, जून महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला होता. तशीच परिस्थिती आता जिल्ह्यात होवू द्यायची नसेल, पुन्हा लाॅकडाउन नको असेल तर सर्वांनी कोरोनाचे नियम पाळून कोरोनोशी दोन हात करायचे आहे. ही लढाई पून्हा जिंकायची आहे, त्यासाठी सर्व जिल्हावासीयांनी साथ द्यावी. असे भावनात्मक आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज केले.

    ते म्हणाले की, जिल्ह्यात सध्या कोरोनाचे ७८० ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. जिल्ह्याचा कोरोना पॉझिटीव्हीटीचा रेट १० टक्क्यांपर्यंत पोचला आहे. धोका वाढलेला आहे. गतवर्षी जशी एप्रिल, मे, जूनमध्ये कोरोना बाधीतांची संख्या वाढली होती तशी आता वाढत आहे. भविष्यातील धोके लक्षात घेता जिल्ह्यातील बंद केलेली सर्व कोविड केअर सेंटर (सीसीसी), डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डीसीएचसी) सूरू करण्यात येत आहे. सर्व ठिकाणी ऑक्सीजन, औषधांचा साठा वाढविण्यात येत आहे.

    संशयितांचा शोध सुरू

    आपण सर्व्हेक्षण मोहीम सुरू केली आहे. सोबतच खासगी डॉक्टर, पॅथेलॉजी लॅब यांच्याकडूनही संशयित रुग्णांची माहिती जमा करीत आहेत. त्या रुग्णांना ट्रॅक करून त्यांची तपासणी करण्यात येत आहेत, लक्षणे असणा-यांवर तातडीने उपचार करीत आहेत. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनीही संशयितांची माहिती प्रशासनास द्यावी. बेफिकिरी खपवून घेणार नाही दिवाळीनंतर बाधीतांची संख्या घटली होती. मात्र आता नागरिकांची बेफीकिरी वाढली आहे.