भाजपा नेत्यांच्या प्रवृत्तीमुळे सरकार सत्तेत येऊ शकले नाही : एकनाथ खडसे

मी शांत बसणार नाही. माझ्यावरचे सर्व आरोप खोटे आहेत. मी कोणता उपद्याप केला नाही. अनेकांवर घोटाळा केल्याचा आरोप आहे. त्या सर्वांना क्लीन चिट मिळते. परंतु मला का क्लीन चिट मिळत नाही आहे. असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच या सर्वांचा लवकरच उलगडा होईल असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

जळगाव : विधानसभा निवडणुकीपासून भाजपाने ( BJP ) वरिष्ट नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यावर अन्याय केला आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मुलीला तिकिट मिळाले होते. परंतु त्यांना देण्यात आले नव्हते. त्यामुळे एकनाथ खडसे नाराज झाले आहेत. अशी चर्चा सर्वत्रच पसरली आहे. पक्षाने त्यांच्यावर वेळोवेळी अन्याय केल्याची खंत खडसेंच्या मनात घर करुन बसली आहे. खडसेंनी मुलाखती दरम्यान म्हटले आहे की, मी मुख्यमंत्री पदाचा दावेदार असल्यामुळे मला नीटपणे संपवण्यात येण्याचा प्रयत्न केला गेला. सहजासहजी संपणारा नाही आहे. असे वक्तव्य त्यांनी केले.

तसेच मी शांत बसणार नाही. माझ्यावरचे सर्व आरोप खोटे आहेत. मी कोणता उपद्याप केला नाही. अनेकांवर घोटाळा केल्याचा आरोप आहे. त्या सर्वांना क्लीन चिट मिळते. परंतु मला का क्लीन चिट मिळत नाही आहे. असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच या सर्वांचा लवकरच उलगडा होईल असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

माझ्यावरील आरोप सिद्ध करु शकले नाहीत

बाकी कोणावरही कारवाई होत नाही. परंतु माझ्यावर का कारवाई करण्यात आली. आणि माझ्यावरील खोटे आरोप आतापर्यंत सिद्ध करु शकले नाही. मला बदनाम करण्यासाठी काही विशिष्ट लोकांनी मिडिला ट्रायल केली होती. मला जाणीवपूर्वक पदावरुन बाजूला करण्यात आले आहे.

भ्रष्ट लोकांना पक्षाने स्वीकारले

एकनाथ खडसेंनी असाही आरोप केला आहे की, ज्यांनी गेली ४० वर्ष जिवाचं रान करुन पक्ष मोठा केला त्यांना धुडकावून भ्रष्ट लोकांना पक्षात स्थान दिले आहे. असे ते म्हणाले. त्यामुळे भाजपा सरकार सत्तेत येऊ शकले नाही. काही नेत्यांच्या प्रवृत्तीमुळे हे सरकार येऊ शकले नाही असा आरोप एकनाथ खडसेंनी भाजपावर केला आहे.

मी वारंवार सर्व पुरावे सादर करुनही कारवाई झाली नाही. असा काय गुन्हा केला. पक्षावर कधीच टीका केली नाही. आम्ही कष्टाने आणलेलं भाजपचं सरकार गेल्याची खंत असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे.